Smita-Joshi
Smita-Joshi 
सप्तरंग

#MokaleVha समस्यांवर बोलू काही

स्मिता प्रकाश जोशी

मी २८ वर्षांची तरुणी असून मी प्रेमविवाह केला. चार महिन्यांनंतर त्याचे गावाकडे यापूर्वीच लग्न झालेले असून सध्या त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही, असे समजले. मला आता त्याच्यासोबत राहायचे नाही. मी दुसरा विवाह करू शकते का? 
- प्रेमविवाह करताना बऱ्याच वेळेला सर्व गोष्टींचा विचार न करता, सर्व माहिती न घेता फक्त व्यक्ती आवडली म्हणून प्रेमविवाह केला जातो. त्यामुळेच बऱ्याच वेळेला अशा प्रकारची फसवणूक होते. तू ज्या तरुणासोबत लग्न केले आहेस, त्याचा यापूर्वी विवाह झाला असल्यामुळे तुझा विवाह हिंदू विवाह कायद्यातील कलम ५ प्रमाणे विवाह होऊ शकत नाही. परंतु तुम्ही विवाह विधी केलेले आहेत, त्यामुळे सदरील विवाह हा हिंदू विवाह कायद्यातील कलम ११ नुसार विवाह शून्य ठरवून घ्यावा लागेल. तसा न्यायालयाकडे तुला अर्ज करावा लागेल. सदरील विवाह हा ‘विवाह’ नाही असे न्यायालयाने घोषित केल्यानंतरच तुला पुन्हा विवाह करता येईल. सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता करून नंतरच तू दुसऱ्‍या विवाहाचा विचार करावा, म्हणजे भविष्यात अडचण येणार नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझे लग्न होऊन सहा महिने झाले असून, पतीला लगेच मूल हवे आहे. मुलाचा विचार करताना पतीने मुलाच्या भविष्याबाबत आर्थिकदृष्ट्या काय विचार केला आहे, याबाबत तो काहीही सांगत नाही. त्यामुळे मला मुलाचा विचार करणे योग्य वाटत नाही. 
- सध्याच्या काळात मुलांच्या लग्नाचे वय वाढलेले आहे. कारण आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आर्थिक स्थिरता मिळाल्यानंतर मुले लग्न करतात. पण त्यामुळे मूल होण्याबाबत विचार करताना पुन्हा वेळ घालवणे, हे फार त्रासदायक होऊन जाते. कारण वय वाढल्यानंतर मूल होण्याबाबतही बऱ्याच अडचणी निर्माण होतात. आत्तापर्यंत तुम्हा दोघांनाही एकमेकांच्या स्वभावाची ओळख झाली असेलच. मुलाबाबत विचार करण्यासाठी हे योग्य वय आहे. मुलाची जबाबदारी ही तुमच्या दोघांचीही आहे, याबाबत तुम्ही एकमेकांशी बोलणे गरजेचे आहे. त्याची सर्व आर्थिक बाजू समजावून घेताना केवळ हक्क म्हणून न विचारता, प्रेमाने काही गोष्टी समजावून घेतल्यास माहिती मिळू शकेल. ही आनंदाची गोष्ट तुम्ही दोघांनी मिळून स्वीकारावी. विनाकारण मनात शंका न आणता सारासार विचार करावा.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT