john dyui
john dyui 
सप्तरंग

Video : लोकशाही-शैक्षणिक सुधारणांचा प्रणेता

सकाळ वृत्तसेवा

डॉ. आंबेडकर १९१३ ते १९१६ या कालावधीत अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात विद्यार्थी म्हणून होते. त्या वेळेस त्यांनी जॉन ड्यूई यांचे एकूण तीन विषय घेतले होते. तत्त्वज्ञान, मानसशास्त्रीय आचारसंहिता आणि नैतिक व राजकीय तत्त्वज्ञान या तीन पेपरद्वारे त्यांनी ड्यूई यांच्या ‘लोकशाही आणि शिक्षण’ या संकल्पनेचा भारताच्या जात व लिंगआधारित भेदभाव यावर प्रकाश टाकला. ‘भारतात जात एक वास्तव, बळ हा विरोधाभास व धर्म एक साधन’ अशी सैद्धांतिक मांडणी करून, भारताच्या जातीप्रश्‍नांबाबत प्रथमच हादरे दिले. भारतातील लोकशाहीचे केवळ राजकीय लोकशाहीत रूपांतर करून चालणार नाही; तर त्यात सामाजिक व आर्थिक लोकशाहीत रूपांतर होणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये बंधुभाव, सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, असा बदल डॉ. आंबेडकरांनी भारताच्या संदर्भात केलेला आहे.

अमेरिकेच्या नागरी युद्धानंतर चार्ल्स एस. पिर्अस, विल्यम जेम्स, जॉन ड्यूई यांनी व्यवहारवादाबाबत विपुल लिखाण केलेले आहे. ड्यूईंच्या मते अनुभव, समूह, विज्ञान व बहुसांस्कृतिकता हे महत्त्वाचे आहेत. ड्यूईंच्या मते लोकशाहीचे काम सरकार स्थापन करणे होय. डॉ. आंबेडकरांच्या मते, लोकशाही केवळ नुसतेच सरकार स्थापन करीत नाही; तर पुढे सर्वांना जवळ करत असते. थोडक्‍यात, ड्यूई यांचे विचार भारताच्या लोकशाहीला उपयुक्त कसे ठरतील, याबाबतचा विस्तार डॉ. आंबेडकरांनी केलेला आहे. त्यामुळे या दोन्ही महान व्यक्तींचे विचार आजच्या लोकशाहीत कसे महत्त्वाचे आहेत, याचा सर्वांगीण अभ्यास व्हावा म्हणून या सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. ड्यूई लोकशाहीची सैद्धांतिक मांडणी करणारे तत्त्वज्ञ मानले जातात. 

जोपर्यंत डॉ. आंबेडकरांचे लोकशाहीबाबतचे विचार आपण समजून घेत नाही तोपर्यंत जॉन ड्यूई यांचे लोकशाहीबाबतचे विचार आपल्याला समजणार नाहीत. ते समजून घेण्यासाठी डॉ. आंबेडकर व जॉन ड्यूई यांना समजणे गरजेचे आहे. येथे खऱ्या अर्थाने शिक्षक-विद्यार्थी यांच्या जडणघडणीत व विचारांमध्ये कसा बदल झालेला आहे, हे आपणास पाहावयास मिळेल. 

भारतासह जगभरातील लोकशाही, शिक्षण, भारताच्या संदर्भातील व्यवहारवाद यावर अभ्यास करणारे लेखक, विचारवंत, अभ्यासक, यांना या सेंटरचा फायदा होणार आहे. जॉन ड्यूई सोसायटीने ड्यूई यांनी लिहिलेले सर्व ३८ ग्रंथ विभागास भेट दिलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण ड्यूई वाचण्याची संधी विद्यापीठात मिळणार आहे. ड्यूई यांच्या सोबत डॉ. आंबेडकर यांच्या बाबतही पश्‍चिमात्य राष्ट्रांना व विचारवंतांना डॉ. आंबेडकर अभ्यासता यावेत, हाही उद्देश या सेंटरची स्थापना करण्यामागे आहे. 

पंडित नेहरू यांनी न्यूयॉर्क येथे ड्यूई यांच्या ९०व्या वाढदिवसाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या व भारताच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. ड्यूई यांना भारतात येणे शक्‍य झाले नाही; परंतु डॉ. आंबेडकरांच्या मार्फत त्यांचे अस्तित्व आज भारतासह जगभर आहे. त्यामुळे विद्यापीठातील या सेंटरला ऐतिहासिक असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. 
- डॉ. विजय खरे, प्राध्यापक व विभागप्रमुख, संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT