Administration ready for flood emergency 200 homeguards will assisted by nine boats satara sakal
सातारा

दरडग्रस्त गावांत प्रशिक्षण पूर्ण; पूरस्थितीसाठी प्रशासन सज्ज

नऊ बोटींद्वारे २०० होमगार्ड करणार मदतकार्य

सकाळ वृत्तसेवा

सातारा : मॉन्सूनची चाहूल लागू लागल्याने जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, जय्यत तयारीही केली आहे. दरडग्रस्त १२४ गावांतील नागरिकांत जागृत्तीबाबत प्रशिक्षणे घेतली आहेत. पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे नऊ बोटींची तपासणीही करण्यात आली आहे. त्यासाठी दोनशे होमगार्डस्‌ना प्रशिक्षण दिले आहे. दरडी कोसळणाऱ्या घाट रस्त्यांवर बांधकाम विभागाला आतापासूनच सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे मॉन्सूनसाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सर्व तयारीनिशी सज्ज आहे.

जिल्ह्यात मागील पावसाळ्यात दरडी कोसळून १४ गावे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली होती. यातून बोध घेऊन आता आगामी पावसाळ्यात या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. त्यांनी आपत्तीचा सामना करण्यासाठी आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात दरडग्रस्त १२४ गावे आहेत. महाबळेश्वर, पाटण, जावळी व सातारा तालुक्यांत ही गावे आहेत.

पावसाळ्यात दुर्गम भागात दरडी कोसळणे, घाट रस्ते खचणे, मातीचे भराव कोसळण्याच्या घटना घडतात. त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. अशा काही घटना घडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनास कळवण्याबरोबर सुरक्षितस्थळी जाणे गरजेचे आहे. लोकांना अशा परिस्थितीत तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

- देविदास ताम्हाणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Rain-Maharashtra Latest Live News Update: मराठवाड्यात मोठी धरणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: अध्याय 1' मध्ये गुलशन देवय्या यांची 'कुलशेखर' या भूमिकेत केली घोषणा

SCROLL FOR NEXT