Prime Minister Narendra Modi esakal
सातारा

'40 लाख मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा'

सीमाप्रश्नी पंतप्रधानांना तरुणांकडून ५०० पत्रे

राजेंद्र ननावरे

मलकापूर (सातारा) : सीमाप्रश्‍नी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) लक्ष घालून सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवावा याकरिता कऱ्हाड तालुक्यातील तरुणांनी पुढाकार घेत पत्र मोहीम (Letter campaign) राबवली. त्यातून सुमारे ५०० पत्रे पंतप्रधानांना पाठवण्यात आली. बेळगाव (Belgaum), कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी ६५ वर्षांपासून लढा सुरू आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा, यासाठी जीवन समर्पित केले. काहींनी तर आपले बलिदान दिले.

कऱ्हाड तालुक्यातील तरुणांनी पुढाकार घेत पत्र मोहीम राबवली. त्यातून सुमारे ५०० पत्रे पंतप्रधानांना पाठवण्यात आली.

सामान्य मराठी माणसापासून ते विविध नेत्यांनी, पत्रकारांनी, कवी-लेखकांनी, कलाकारांनी आपापल्या परीने हा प्रश्न सुटावा यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हा रक्तरंजित लढा आजतागायत सुरू आहे. ‘सीमाप्रश्न मार्गी लावून ४० लाख मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा,’ अशी भावना तरुण- तरुणींनी पत्राद्वारे व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५०० पत्रे लिहिली आहेत. वैष्णव काशीद- पाटील, धैर्यशील कदम, समर्थ सूर्यवंशी, यश अतकरे, आदिती देशमुख, वैष्णवी जाधव, पल्लवी जायभाये, वैष्णवी सर्वज्ञ यांनी पत्र मोहीम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये हनुमान जयंती निमित्ताने 51 फूट उंच मारुती च्या दर्शनाला गर्दी

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT