Atul Bhosale esakal
सातारा

कर्ज फेडणाऱ्यांना सरकार 50 हजार देणार होतं, त्याचं काय झालं?

शेती पंपासाठी प्रतियुनिट एक रुपये १६ पैसे दर द्या : अतुल भोसले

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : शेती पंपासाठी (Agricultural Pump) प्रतियुनिट एक रुपये १६ पैसे पूर्वी दर होता. तो आता प्रतियुनिट चार रुपये ३५ पैसे झाला आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्याव्दारे शेतकऱ्यांची लूट होत आहे, ती लूट थांबवावी, लादलेली दरवाढ रद्द करावी, पूरग्रस्तांना त्वरित अर्थसहायक करावे, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले (BJP General Secretary Atul Bhosale) यांनी केली. शेती पंपाच्या वीज दरवाढीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भाजपतर्फे तहसीदार कार्यालय, वीज कंपनीच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

शेतीपंपाच्या बिलासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे शेतीपंपासाठी आकारला जाणार दर पूर्वीप्रमाणेच प्रतियुनिट एक रुपये १६ पैसे दरानेच बिल आकारावे.

येथील कोल्हापूर नाक्यावरून मोर्चास प्रारंभ झाला. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, दयानंद पाटील, निवासराव थोरात, सयाजी यादव, धोंडीराम जाधव, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, मुकुंद चरेगावकर, प्रमोद पाटील, मोहनराव जाधव, धनाजी जाधव, उमेश शिंदे, आबासाहेब गावडे, चंद्रहास जाधव, तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, सचिन पाचुपते, गजेंद्र पाटील, बाळासाहेब घाडगे उपस्थित होते. येथील तहसीलदार कार्यालयापासून मोर्चास सुरवात झाली. मुख्य मार्गाने वीज कंपनीच्या कार्यालय व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्यावेळी तेथे निवेदन देण्यात आले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी निवेदन देण्यात आले. त्यानंतर श्री. भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

श्री. भोसले म्हणाले, शेतीपंपाच्या बिलासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे शेतीपंपासाठी आकारला जाणार दर पूर्वीप्रमाणेच प्रतियुनिट एक रुपये १६ पैसे दरानेच बिल आकारावे. महापुरामुळे सहकारी जलसिंचन योजनांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्यांनाही मोठी मदत करुन पूरग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य मिळावे, सरकारने मार्चपासून सबसिडी बंद केल्याने चार रूपये ३५ पैसै प्रमाणे प्रतियुनिट बिल येत आहे. शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची भूमिका घेत आहे, तेव्हा असे अनुचित पाऊल उचलू नये. कोरोना, पुराचे संकट येवून गेले असल्याने वीज कनेक्शन तोडल्यास शेतकरी संकटात सापडू शकतो. तेव्हा सबसिडी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने करावे. पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत देण्यात यावी. महात्मा कृषी फुले योजनेतून नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार रूपये राज्य सरकार देणार होते, ते लवकरात-लवकर द्यावे, असेही भोसले यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inflation: महागाईचा पुन्हा भडका! आले-लसूण अन् कांद्याने वाढवल्या चिंता; कोणत्या राज्यात महागाई सर्वाधिक? ग्रामीण भागाला मोठा फटका?

Pet Lovers साठी महत्त्वाची बातमी! कुत्रा-मांजर पाळता? तर आधी परवाना घ्या; लायसन्स सक्तीचे; नियम मोडल्यास काय होणार?

'झपाटलेला'चं 'हे' सिक्रेट आजवर कळलंच नाही; सिनेमात एक नाही तर 9 तात्या विंचू होते! कितीही वेळा फिल्म पाहिली तरी हे लक्षात आलं नसेल

Latest Marathi News Live Update : कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन चौकशी लावली- बावनकुळे

Jharkhand Naxal-Free Push: झारखंड नक्षलमुक्तीकडे मोठे पाऊल; चाईबासाही नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर

SCROLL FOR NEXT