सातारा

पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे डोळ्यादेखत नुकसान, बळिराजा हवालदिल

जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : जून महिन्यात सलग उघडीप व त्यानंतरच्या काळात सातत्याने झालेल्या पावसामुळे यावर्षी खरीप हंगामातील पिके समाधानकारक आहेत. मात्र, दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेली खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होऊन एकूण उत्पादनात घट होणार आहे. परतीच्या पावसाने बळिराजा मात्र हवालदिल झाला आहे. 

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वेळेत पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर मात्र संपूर्ण जून व जुलै महिन्यांतील काही दिवस कधी पाऊस तर काही काळ उघडीप दिल्याने आंतरमशागतीची कामे व रासायनिक खतांचा डोस योग्य वेळी मिळाला होता. पुन्हा सातत्याने पाऊस झाल्यामुळे या हंगामातील पिके समाधानकारक आहेत. उडीद, चवळी, घेवडा, सोयाबीन व भुईमूग काढणी पूर्णत्वाकडे आली असून, तालुक्‍याचे खरीप हंगामातील मुख्य पीक असणाऱ्या भाताच्या काढणीस सुरुवात झाली आहे. चार दिवसांपूर्वी हलक्‍या पावसाच्या सरी पडल्या होत्या. परंतु, पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने पुन्हा खरिपाच्या काढणीस वेग आला होता. मात्र, गेली दोन दिवस परतीच्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून दुपारी दीड वाजता अचानक पावसाने सुरुवात केली. त्यामुळे खरिपाच्या काढणीस ब्रेक लागला. शेतात कापणी केलेली भात पिके अचानक आलेल्या पावसामुळे शेतात भिजली आहेत. सायंकाळी सात वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दोन तास मुसळधार पाऊस कोसळत होता. सगळीकडे पाणीच पाणी झाले. शनिवारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे ते आज दिवसभर तसेच होते. त्यामुळे शेतात शनिवारी बंद झालेले काम आज दिवसभर करता आले नाही. काढणी व मळणी केलेल्या पिकांना ढगाळ वातावरण असल्याने ऊन देता येत नाही आणि ढगाळ वातावरणामुळे काढणीत व्यत्यय अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. पावसाने उघडीप दिली नाही तर हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बळिराजा हवालदिल झाला आहे. 

चाकरमान्यांचे 'आउटगोइंग' झाल्याने मजुरांची टंचाई! 

कोरोना महामारीमुळे शहरातील चाकरमान्यांचे मे महिन्यात तालुक्‍यात आगमन झाले. त्यामुळे अनेक वर्षे पडून असणारी जमीन यावर्षी लागवडीखाली आणली. भात व इतर बियाणांची विक्रमी विक्री झाली. मात्र, चाकरमानी पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहराकडे स्थलांतरित झाले आहेत. कोरोनामुळे चाकरमान्यांच्या "इनकमिंग'मुळे मे ते ऑगस्ट या कालावधीत मजुरांची टंचाई जाणवली नाही. मात्र, आता ऐन खरिपाच्या काढणीत चाकरमान्यांचे शहराकडे "आउटगोइंग' झाल्याने मजुरांची टंचाई भासणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT