Sugar Cane esakal
सातारा

एफआरपीच्या तुकड्याला शेतकरी संघटनांचा विरोध

उमेश बांबरे

जिल्ह्यात सहकारी व खासगी असे १६ साखर कारखाने यावर्षीही गाळपाच्या तयारीत आहेत.

सातारा : रास्‍त आणि किफायतशीर भावाचे (FRP) तुकडे करून शेतकऱ्यांना बिले देण्याची भूमिका कारखान्यांची असून त्यावर केंद्र व राज्य सरकारकडून कोणतीच भूमिका स्पष्ट झालेली नाही. या परिस्थितीत जिल्ह्यातील आठ सहकारी व आठ खासगी साखर कारखाने (Private Sugar Factory) ऑक्टोबरपासून गळीत सुरू करत आहेत. शेतकरी संघटनांनी (Shetkari Sanghatana) एफआरपीच्या तुकड्याला विरोध केल्याने या प्रश्‍नावरून आंदोलनाची चिन्हे आहेत. दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने उसाच्या वजनावर परिणाम झाला आहे. सांगली, कोल्हापूरला पुरामुळे झालेल्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सहकारी व खासगी असे १६ साखर कारखाने यावर्षीही गाळपाच्या तयारीत आहेत. गेल्या वर्षी ऐन कोरोनात कारखान्यांनी संपूर्ण उसाचे गाळप करत सर्वाधिक कोटी क्‍विंटलच्या घरात साखरनिर्मिती केली. त्यामुळे कारखान्यांचा मागील हंगाम चांगला फायद्यात गेला आहे. यावर्षी सर्वच कारखान्यांचे बॉयलर पेटले असून आता ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष गाळप हंगाम सुरू होणार आहे. यावर्षी प्रथमच इतक्या लवकर हंगाम सुरू होऊन तो लवकर संपणारही असल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी जिल्ह्यात ऊस उपलब्ध असला तरी पावसाळ्यात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत आलेल्या पुरामुळे उसाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे तेथील कारखाने आता सातारा जिल्ह्यातील ऊस घेऊन जाऊन त्याचे गाळप करण्याची युक्ती लढवू शकतात. त्यातूनच उसाची पळवापळवी होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सध्या गेल्या वर्षीच्या गाळप केलेल्या उसाच्या बिलाची बाकी देण्यावरून शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एफआरपीचे तुकडे करून कारखाने बिले देत असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. त्यातून शेतकऱ्यांना कोणतीही देणी भागविता येत नसल्याने एकरकमी एफआरपी मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. तर, दुसरीकडे साखर कारखाने मात्र, शासनाच्या भूमिकेकडे लक्ष देऊन आहेत. कारखान्यांनी अद्याप एफआरपीबाबत कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. पण, शेतकरी संघटनांनी आवाज उठविण्यास सुरवात केल्याने ऐन हंगामाच्या तोंडावर वाद चिघळण्याची भीती आहे. गेल्या वर्षी बहुतांश कारखान्यांनी आपापली एफआरपी रक्कम पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोच पायंडा यावर्षीही राहण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता शेतकऱ्यांत एफआरपीविषयी जागृती करण्याची भूमिका घेत गावोगावी मेळावे घेण्यास सुरवात केली आहे. एफआरपीचे तुकडे झाल्यास शेतकरी उद्‌ध्‍वस्त होईल. त्यामुळे या प्रश्‍नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे.

- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

एफआरपीचे तुकडे होऊ नयेत, शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी रयत क्रांती संघटनेने यावेळेस आंदोलनाची भूमिका घेतली आहे. कारखान्यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असे संघटनेचे म्हणणे आहे.

- प्रकाश साबळे, युवक जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT