Ganeshotsav 2022 Satara
Ganeshotsav 2022 Satara 
सातारा

Ganeshotsav 2022 : ‘चंदन कन्या’ने मिटवली वालूथच्या वधूपित्यांची चिंता

प्रशांत घाडगे

सातारा : ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ याबाबत शासन, सामाजिक संस्था प्रबोधन करतात. परंतु, मुलीच्या जन्माचा पालकांना आनंद व्हावा, तिच्या पालनपोषणाची व प्रामुख्याने विवाह खर्चाची तरतूद करण्याबाबत कोणीच फारसा पुढाकार घेताना दिसत नाही. मुलीच्या लग्नाची पित्याची विवंचना कमी व्हावी, यासाठी वालूथ (ता. जावळी) येथील अवलिया संजय बेलोशे यांनी ‘चंदन कन्या’ ही अभिनव योजना सुरू केली आहे. यात मुलीच्या जन्मानंतर ते त्या कुटुंबीयांना पाच चंदनाची रोपे मोफत भेट देऊन त्याची जोपासना करायला सांगतात. मुलीचे लग्नाचे वय झाल्यानंतर त्या झाडांची विक्री करून त्या पैशातून कुटुंबीयांनी मुलीचे लग्न करावे, अशी ही संकल्पना आहे. त्यातून निसर्गदेवतेचीही उपासना होत आहे.

निसर्ग ही देवाने दिलेली सुंदर देणगी आहे. समाजातील प्रत्येकाने निसर्गाची सेवा करून त्याच्याशी संवाद साधणे आवश्‍यक आहे. या निसर्गातून मनुष्याला लागणारे सर्व घटक मिळतात. मात्र, केवळ पर्यावरणाच्या हानीमुळे समाजाला असंख्य संकटांचा सामना करावा लागतो. या संकटातून वाचण्यासाठी व कुटुंबांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी संजय बेलोशे या निसर्गमित्रांनी वडील धोंडिबा श्री‍पती बेलोशे स्मरणार्थ मातोश्री नर्सरीच्या माध्यमातून १५ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत नावीन्यपूर्ण संकल्पना राबवित आहेत.

या संकल्पनेतून मुलींची भविष्याची अडचण दूर व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. ग्रामीण भागात, मुलीच्या लग्नावेळी वडिलांना पैशाची चणचण भासते, असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. ‘चंदन कन्या’ योजनेमध्ये मुलीच्या कुटुंबीयांनी रोपाची योग्य जोपासना केल्यास त्यांना पुढील २० वर्षांनंतर त्याचा लाभ होणार आहे. या झाडांची रोपे लावल्यानंतर त्याची सात-बाऱ्यावर नोंद बंधनकारक असते.

त्यामुळे झाडांची विक्री करताना कुठलीही अडचण येत नाही.

निसर्गाच्या संगोपनासाठी संजय बेलोशे यांनी वालूथ जिल्हा परिषद शाळेतही विविध उपक्रम राबविले आहेत. गेल्या दोन आठवड्यापूर्वी शाळेच्या आवारात आंबा, चिंकू, नारळ, कोकम यासह विविध प्रकारच्या रोपांची लागवड केली. शाळेचे विद्यार्थी या रोपांची जोपासना करणार आहेत. या लागवडीमुळे शाळेचा परिसर हिरवागार होण्यास मदत होणार आहे.

वृक्षच बनणार सोयरे...

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुख रूचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगी येत.... या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्त्‍व सांगितले आहे. त्याची प्रत्यक्ष अनुभूती संजय बेलोशे त्यांच्या उपक्रमातून देत आहेत. वृक्ष हे आपल्या अन्न, वस्त्र, निवारा त्याचबरोबर उपचारांमध्येही महत्त्‍वाची भूमिका बजावतात. लग्नावेळी नातेवाईक एकमेकाला मदत करत असतात. त्याअर्थाने ‘चंदन कन्या’ योजना लग्नासाठी पैसे उभारण्यास मदत करून एक प्रकारे मुलीच्या पित्याच्या सोयऱ्याची भूमिका वठवणार आहे. नागरिकांनी आपल्या परीने अशा समाजोपयोगी कामात झोकून घ्यावे, असे आवाहनही बेलोशे करतात.

जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभल्याने त्याची संगोपना योग्य पध्दतीने झाली पाहिजे. त्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निसर्गाची जोपासना करत आहे. ‘चंदन कन्या’ योजना याचाच एक भाग आहे. मुलींनी व त्यांच्या कुटुंबीयांनी रोपाला आपल्याच कुटुंबातील सदस्य मानल्यास त्याचा भविष्यात फायदा होईल. सध्‍या ही योजना एका गावापुरती मर्यादित असून पुढील काळात ती तालुक्यात राबविण्याचा मानस आहे.

- संजय बेलोशे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : कॉँग्रेसने ६० वर्षे देशाला बुडविले ; शिंदे

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT