सातारा

माण तालुक्‍यात जोरदार पाऊस; ब्रिटिशकालीन धरण भरले तुडुंब

सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड (जि. सातारा) : माण तालुक्‍यातील देवापूरनजीकचे राजेवाडी धरण भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. माण तालुक्‍यात स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश राजवटीत राणी व्हिक्‍टोरिया एलिझाबेझ यांनी माणमधील दुष्काळात जनतेला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख उद्देशाने 140 वर्षांपूर्वी या मातीच्या बंधाऱ्याच्या धरणाचे बांधकाम केले होते. 

सुमारे दोन टीएमसीचे पाणी साठवण क्षमतेचे हे धरण आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र सातारा जिल्ह्यात, बंधारा सांगली जिल्ह्यात व सिंचन क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात असा तिहेरी संगम पाहण्यास मिळतो. सलग दुसऱ्या वर्षीही हे धरण भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

कायम दुष्काळी भाग अशी ओळख असणा-या माण तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावत तेथील नदी, नाले व बंधारे तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. दरवर्षी माणला परतीच्या पावसाचा फटका बसत असतो, त्यामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतो. मात्र, या सगळ्यात अशी बंधारे तुडुंब भरुन वाहू लागली की, येथील शेतक-यांनाही काही अंशी दिलासा मिळत असतो. त्यामुळे परतीच्या पावसाच्या आधीच येथील शेतकरी नियोजन करत असल्यामुळे पिकांना फारसा फटका बसत नसल्याचे पहायला मिळते.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT