journalism  sakal
सातारा

पत्रकारांनी वस्तुनिष्ठ पत्रकारिता करावी ; उत्तम दिघे

पत्रकारितेचे स्वरूप बदलत चालले आहे. बदलत्या काळानुरूप साधनांचा अवलंब करत पत्रकारांनी वस्तुनिष्ठ पत्रकारिता करत समाजप्रतीची न्यायिक भूमिका जपावी

सकाळ वृत्तसेवा

उंब्रज : पत्रकारितेचे स्वरूप बदलत चालले आहे. बदलत्या काळानुरूप साधनांचा अवलंब करत पत्रकारांनी (Journalist) वस्तुनिष्ठ पत्रकारिता करत समाजप्रतीची न्यायिक भूमिका जपावी, असे मत कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी व्यक्त केले. द पॉवर ऑफ इंडिया मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र,(The Power of India Media Foundation Maharashtra) सौ. मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालय उंब्रज, रोटरी क्लब ऑफ उंब्रज, वसुंधरा पर्यावरण संशोधन व संवर्धन संस्था उंब्रज यांच्या सयुक्तिक वतीने जगताप महिला महाविद्यालयात आज पत्रकारांना पत्रकार सेवा गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

या वेळी ते बोलत होते. या वेळी सायबर पोलिस (Cyber Police)ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर, रयत कौन्सिलचे सदस्य द. श्री. जाधव, द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनचे राज्य सचिव अनिल कदम, उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड, तळबीड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील, प्राचार्य संजय कांबळे, द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनचे (The Power of Media Foundation)जिल्हाध्यक्ष पराग शेणोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ‘सकाळ’चे मुख्य बातमीदार प्रवीण जाधव, वाहगावचे बातमीदार तानाजी पवार, पुढारीचे मसूर विभाग प्रतिनिधी दिलीप माने, प्रभातचे उंब्रज विभाग प्रतिनिधी दिलीपराज चव्हाण, तरुण भारतचे चोरे विभाग प्रतिनिधी दिलीप साळुंखे यांना पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पत्रकार सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री. दिघे म्हणाले, ‘‘आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली. त्याकाळी सामाजिक विषय हाताळून समाज प्रबोधनाचे काम केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, लोकमान्य टिळक, आगरकर आदी थोर व्यक्तींनीही वेगवेगळी वृत्तपत्रे काढली. सोशीत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम व त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. सध्या काळानुरूप पत्रकारितेचे स्वरूप बदलत चालले आहे; परंतु तिचा उद्देश व ताकद आजही तेवढीच आहे. त्यामुळे पत्रकारांनी परिस्थितीचा अभ्यास करून वस्तुनिष्ठ पत्रकारिता करण्याची नितांत गरज आहे.’’ समाजाच्या जडणघडणीत वृत्तपत्रे आणि पत्रकारांचे योगदान मोलाचे असल्याचे निरीक्षक देवकर यांनी सांगितले. या वेळी सहायक निरीक्षक अजय गोरड, संघटनेचे राज्य सचिव अनिल कदम यांनी मनोगत व्यक्त केले. तानाजी कदम यांनी सूत्रसंचालन केले. पराग शेणोलकर यांनी आभार मानले. या वेळी मसूर व उंब्रज विभागातील पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, प्राध्यापक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT