crop loss rain destroyed grass farmers damage Karad  sakal
सातारा

Satara : पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

पिकांच्या नुकसानीने शेतकरी हतबल; २० ते ५० टक्क्यांपर्यंत फटका

- हेमंत पवार

कऱ्हाड : ऐन सुगीच्या हंगामात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान वाढले आहे. सोयाबीन, भुईमूग, बाजरी, भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला, फळभाज्या आणि फळबागाही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत. पावसाबरोबरच्या वाऱ्याने काढणीस आलेले भात पीक मोडून पडले आहे. भाजीपाल्यासह फळबागांमध्ये रोग-किडींचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावल्यासारखी स्थिती झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फिरले आहे.

हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज सांगितल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घेतले. त्यासाठी त्यांनी सोसायट्या, बॅंका, पतसंस्थांची कर्जे काढले. त्यातून पिके फुलवली. पहिल्या टप्प्यात पाऊसही चांगला झाला. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन होईल, या आशेवर शेतकरी होते. मात्र, जिल्ह्यात आठवडाभरातील पावसामुळे काढणीस आलेले सोयाबीन, बाजरी, भुईमूग, मका, भात पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे भात, भुईमूग, सोयाबीनची काढणी खोळंबली आहे. दसऱ्यानंतर भात कापणी, भुईमूग, सोयाबीन काढणीस सुरुवात होते.

खटाव तालुक्यात उशिरा लागण होणाऱ्या कांद्याची रोपेही खराब झाली आहेत. शेतात पाणी साचून राहिल्याने भाजीपाला, टोमॅटो, मिरची, कोबी या पिकांनाही फटका बसला आहे. भाजीपाला, फळभाज्या आणि फळबागाही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत. पावसाबरोबरच्या वाऱ्याने काढणीस आलेले भात पीक मोडून पडले आहे. भाजीपाल्यासह फळबागांमध्ये रोग- किडींचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावल्यासारखी स्थिती झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फिरले आहे. सुमारे २० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

अवकाळी पावसामुळे अजूनही शेतात पाणी साचले आहे. भात कापणी, भुईमूग काढणी खोळंबली आहे. काही ठिकाणी भात अर्ध्यावरच शेतात पडले आहे. कापलेल्या पिंजरात पाणी तुंबल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

- उत्तमराव चव्हाण, शेतकरी.

ऊसही झाला आडवा

यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पिकविलेला ऊस चांगलाच तरारून आला होता. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन मिळून चार पैसे जादाचे मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, सततच्या पावसाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसाने शेतात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे उभा असलेला ऊस आडवा झाला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT