satara sakal
सातारा

Satara : शाळेसाठी नदीतून जीवघेणा प्रवास

चितळीतील विद्यार्थी- पालक त्रस्त; ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

संजय जगताप

मायणी : चितळी (ता. खटाव) येथील हनुमाननगर (संध्यामठ) भागातील मुलांना रोजच शेत बांधावरून चिखल तुडवत, येरळा नदीच्या पाण्यातून जीवघेणी वाट काढत शाळेसाठी ये- जा करावी लागत आहे. संबंधित ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी- पालक त्रस्त आहेत.

चितळी गावापासून दक्षिणेला सुमारे चार किलोमीटर अंतरावर हनुमाननगर (संध्यामठ) उपनगर आहे. तेथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गावाच्या पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर नवमहाराष्ट्र विद्यालयात जावे लागते. मात्र, त्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यासाठी येरळा नदीतून सुमारे चार फूट पाण्यातून वाट काढून जीवघेणा प्रवास करत जावे लागते.

नदीवर ठिकठिकाणी बंधारे आहेत, तरीही येरळेवरील नेर आणि येरळवाडी धरण भरून वाहू लागल्यास नदीतील प्रवाहाचा जोर वाढतो. पाण्याची खोलीही वाढते. अशा बिकट व धोकादायक परिस्थितीतही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याशिवाय पर्याय नसतो. संध्या मठातून शाळेकडे जाण्यासाठी दुसरा एक मार्ग नदीच्या पश्चिमेकडून आहे. तेथेही दोन किलोमीटर शेताच्या बांधावरून तर दोन किलोमीटर कच्च्या रस्त्याने जावे लागते. दलदल, चिखल तुडवत प्रवास करावा लागतो. पाऊस अधिक पडल्यास सायकलचाही उपयोग होत नाही. उन्हाळ्यातही स्थितीत फारसा बदल होत नाही. माहुलीतील (जि. सांगली) टेंभूच्या पंपहाऊसमध्ये अडचण निर्माण झाल्यास टेंभू कालव्यातून अतिरिक्त पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीला कायम पाणी असतेच. शिवाय तेथे बागायती क्षेत्रामुळे नदीकाठच्या भागात दलदलीचा सामना करावाच लागतो.

उन्हाळा असो वा पावसाळा, पाण्यातून वाट काढत, चिखल तुडवत शाळेत जाण्याशिवाय गत्यंतर नसते. त्रासाचे व धोक्याचे असल्याने अनेक जण शाळेकडे पाठही फिरवतात. त्यामुळे मुलींचे शिक्षण थांबत आहे. सध्या तेथील अठरा मुले- मुली शाळेला जातात. ती मुले घरी येईपर्यंत पालकांच्या जिवाला घोर असतो. वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असलेल्यांना रस्त्याअभावी वेळेत उपचार मिळत नसल्याने दुर्दैवाने त्यांना जीव गमवावा लागत आहे. त्या समस्या दूर करण्यासाठी रहिवाशांनी अनेकदा ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींकडे मागणी केली आहे. मात्र, अद्याप प्रश्न जैसे थे आहे. रहिवाशांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच साद घातली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT