Leopard sakal
सातारा

नरभक्षक होण्याआधीच बिबट्याला आवरा! येणकेतील घटनेतून वनविभाग घेईल बोध?

ऊसतोडणीसाठी फडाकडे जाताना बिबट्याने अचानक हल्ला चढवून मजुरांच्या टोळीतील चार वर्षांच्या मुलाला ठार केले.

हेमंत पवार

कऱ्हाड - ऊसतोडणीसाठी फडाकडे जाताना बिबट्याने अचानक हल्ला चढवून मजुरांच्या टोळीतील चार वर्षांच्या मुलाला ठार केले. महिन्यापूर्वी तांबवेतील मुलगा बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला. माणसांवर हल्ला करायला लागला, की बिबट्या नरभक्षक होतो. त्यामुळे सवय लागून नरभक्षक होण्याअगोदरच वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. त्यासाठी तातडीने पावले उचलून कार्यवाही करण्याची गरज आहे.

कऱ्हाड, पाटण तालुक्यांत बिबट्यांची संख्या वाढली आहे. सध्या येणकेसह परिसरातील आगाशिवनगर, तांबवे, पश्चिम सुपने, पाठरवाडी, ढेबेवाडी परिसरात बिबट्याचा वावर दिसतो. त्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी ते हल्ले करतानाचे प्रकार घडत आहेत. हंगाम सुरू झाल्याने सध्या ऊसतोडी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बिबट्या आता उसाच्या फडाबाहेर पडू लागले आहेत. काल (ता. १५) रयत साखर कारखान्याच्या मजुरांची टोळी येणकेतील शिवारात ऊसतोडीसाठी वास्तवास आली आहे.

नेहमीप्रमाणे पहाटे मजूर कुटुंबास ऊसतोडणीसाठी उसाच्या फडाकडे निघाले होते. आईसोबत चार वर्षांचा आकाशही होता. तो आईच्या पाठीमागून जात असताना उसातून अचानक आलेल्या बिबट्याने काही कळायच्या आत आकाशला सुमारे १५० मीटर दूरवर फरफट नेले. तेथे त्याला ठार करून बिबट्याने तेथून धूम ठोकली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आकाशला पाहून येणकेतील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. वारंवार तोंडी व लेखी कळवूनही वनविभाग दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. तासभर झालेल्या गोंधळामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत होते. हा बिबट्या नरभक्षक होण्याअगोदरच त्याला जेरबंद करण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांकडून पिकांना रात्री पाणी देणे बंद

तांबवे परिसरातील एका लहान मुलावर महिन्यापूर्वी बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले होते. बिबट्याच्या हल्ल्यातून तो मुलगा शर्तीने वाचला. त्यानंतर सातत्याने बिबट्याचे शेतकरी, ग्रामस्थ, महिलांना दर्शन होत आहे. त्यामुळे त्याची मोठी दहशत आबालवृद्धांवर आहे. त्याच्या दहशतीने आता शेतकऱ्यांनी पिकास रात्री पाणी देण्यास जाणे बंद केले आहे. त्यामुळे शेतीचेही मोठे नुकसान होऊ लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT