Sugarcane Workers Children esakal
सातारा

ZP Schools : भविष्य कसं घडणार? ऊसतोड मजुरांच्या मुलांची शाळा फडातच; साखरशाळा बंदचा चिमुरड्यांना फटका

ऊसतोडणीच्या काळात आई-वडिलांबरोबर आलेली मुले शाळेत जात नाहीत.

हेमंत पवार

सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात लातूर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, सोलापूर जिल्ह्यांतील मजुरांची कुटुंबे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असतात.

कऱ्हाड : साखर शाळा (School) बंद झाल्याने ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना ते ज्या परिसरात वास्तव्यास आहेत. त्या परिसरातील जिल्हा परिषद शाळांत (Zilla Parishad School) शिक्षणासाठी घालावे, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी उत्सुक नसल्याचेच चित्र आहे.

साखर कारखान्याच्या परिसरात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी त्यांच्या वस्तीवर १९९४ पासून तात्पुरत्या हंगामी शाळा सुरू करण्यात आल्या. त्यांना साखरशाळा असे नाव देण्यात आले. या शाळेकरिता लागणाऱ्या भौतिक सुविधा साखर कारखान्यांद्वारे पुरवण्यात येत होत्या. ऊसतोडणीच्या काळात आई-वडिलांबरोबर आलेली मुले शाळेत जात नाहीत.

गरिबीमुळे अनेक मजुर मुलांना शिकवू शकत नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने पटसंख्येची अट न ठेवता साखरशाळा सुरू करून त्यासाठी शिक्षकांचीही नेमणूक केली. पाचवीपर्यंतचे वर्ग त्या साखरशाळेत भरत होते. शासनाने ही साखर शाळा संकल्पनाच बंद केली आहे.

कारखाना कार्यस्थळावरील शाळा बंदच

सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात लातूर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, सोलापूर जिल्ह्यांतील मजुरांची कुटुंबे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असतात. त्यांच्याबरोबर त्यांची मुलेही कारखाना परिसरात येत असत. त्यांचे शिक्षण अर्ध्यातच सुटू नये, यासाठी शासनाने साखर शाळा सुरू केल्या होत्या. प्रत्येक कारखाना कार्यस्थळावर या साखर शाळा सुरू होत्या. त्यासाठी पटसंख्येची अट शिथिल होती. त्यासाठी दोन शिक्षकांची नेमणूकही केली जात होती.

मुक्काम एकीकडे शाळा दुसरीकडे

ऊसतोड मजुरांना गावातील माळरानावरील किंवा गावापासून दूरवरच्या जागी वास्तव्यास जागा दिली जाते. तेथे राहून ते ऊसतोडीसाठी जात असतात. त्याचदरम्यान त्यांच्या मुलांना शाळेत घालायचे म्हटले, तर ती मुले दूरवरच्या शाळेत चालत जाऊन शिकण्यासाठी इच्छुक राहात नाहीत, असे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची मोठी शैक्षणिक गैरसोय होत आहे. सध्या मुक्काम एकीकडे आणि शाळा दुसरीकडे अशीच स्थिती झाली आहे.

शासनाने २०१५ पासून साखरशाळा ही संकल्पना बंद केली आहे. ऊसतोड मजुरांची मुले ज्या शाळेच्या परिसरात आहेत त्या शाळांत त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घालावे, असे आदेश आहेत. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांच्या मुलांना शाळांत सामावून घेण्यासाठीची कार्यवाही केली जात आहे.

-संमती देशमाने, गटशिक्षणाधिकारी, कऱ्हाड

आम्ही ऊसतोडीसाठी दर वर्षी साखर कारखाना परिसरात येतो. आमचे आयुष्य काबाडकष्ट करण्यात गेले. गावाकडे मुलांना सांभाळण्यासाठी कुणी नसल्याने त्यांनाही आम्ही सोबत घेऊन येतो. आम्ही ज्या परिसरात राहतो त्या ठिकाणाहून शाळा लांब आहे. त्यांना दररोज कोण सोडायचे आणि आणायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आमची मुले उसाच्या फडातच आमच्याबरोबर असतात.

-गणेश गिरी, ऊसतोड मजूर, बीड (सध्या रा. विंग, जि. सातारा)

मुले शाळेत न जाण्यास दुजाभावही कारणीभूत

शासनाच्या साखर शाळेत फक्त ऊसतोड मजुरांचीच मुले जातात. त्यामुळे त्यांच्यातल्या त्यांच्यात ते रमून जात होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळेत मजुरांच्या मुलांचे वागणे, कपडे आणि नियमित मुलांमध्ये फरक असतो. त्यामुळे काही वेळेला त्या मजुरांच्या मुलांना चिडवले जाते. त्यामुळेही ती मुले शाळेत जाण्यासाठी नकार देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

R. Madhvan Parenting Tips: "मुलांना मोकळा वेळ देऊ नका!" आर. माधवनने दिल्या यशस्वी आणि शिस्तबद्ध मुलं घडवण्याच्या टिप्स

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Irregular Sleep Schedules: ८ तास झोपल्यानंतरही बिघडू शकतं का आरोग्य? जाणून घ्या झोपेचं योग्य वेळापत्रक का गरजेचं

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

SCROLL FOR NEXT