Shambhuraj Desai esakal
सातारा

जिल्ह्यात या, मग कळेल; फडणवीस, पाटलांना गृहराज्यमंत्र्यांचं चोख प्रत्युत्तर

हेमंत पवार

विरोधी पक्षनेते फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बंदला प्रतिसाद मिळालेला नाही, बंद फसला आहे, असं वक्तव्य केलं होतं.

कऱ्हाड (सातारा) : विरोधक जर सातारा जिल्ह्यात आले, तर त्यांना बंदला प्रतिसाद आहे की नाही हे कळेल. आज सोमवारी सकाळपासून दुपारपर्यंत लोकांनी 100 टक्के बंद पाळला. विरोधकांना केवळ महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका करणे, महाविकास आघाडीने एखादा विषय हातात घेतला, की तो कशा पध्दतीने हाणून पाडता येईल एवढेच काम आहे. विरोधकांचा त्याला विरोध असेल तर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जो महाराष्ट्रातील जनतेने बंदला पाठिंबा दिला आहे, तो त्यांना मान्य नाही, असा त्याचा अर्थ काढावा लागेल, अशी टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी कऱ्हाडात (जि. सातारा) लगावला.

महाराष्ट्र बंदच्या (Maharashtra Band) पार्श्वभूमीवर मंत्री देसाई यांनी आज कऱ्हाड शहरातील बंदोबस्ताची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे केले आहेत, त्याविरोधात उत्तर भारतात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. ते आंदोलन सुरु असताना केंद्र सरकारमध्ये एका राज्यमंत्र्यांच्या मुलाकडून नऊ शेतकऱ्यांना गाडी अंगावर घालून चिरडण्यात आले. त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळपासून सातारा जिल्ह्यामध्ये पोलिस बंदोबस्ताची मी पाहणी करत आहे. शांततेच्या मार्गाने लोकांनीही बंद पाळला आहे. दुपारनंतर काही ठिकाणी थोड्या प्रमाणात दुकाने सुरु झाली आहेत. मात्र, सकाळी पूर्णपणे बंदमध्ये सहभागी होवून जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जी शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेतलीय. केंद्रातल्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले आहे, त्यांचा महाराष्ट्रातून, सातारा जिल्ह्यातून उत्स्फूर्तपणे निषेध पाळण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बंदला प्रतिसाद मिळालेला नाही, बंद फसला आहे, या वक्तव्यावर मंत्री देसाई म्हणाले, विरोधक जर सातारा जिल्ह्यात आले, तर त्यांना बंदला प्रतिसाद आहे की नाही हे कळेल. सकाळपासून दुपारपर्यंत लोकांनी १०० टक्के बंद पाळला आहे. विरोधकांना केवळ महाविकास आघाडीवर टीका करणे, महाविकास आघाडीने एखादा विषय हातात घेतला की तो कशा पध्दतीने हाणून पाडता येईल एवढेच पाहतात. विरोधकांचा त्याला विरोध असेल, तर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जो महाराष्ट्रातील जनतेने बंदला पाठिंबा दिला आहे, तो त्यांना मान्य नाही, असाच त्याचा अर्थ काढावा लागेल.

खुर्च्या आपटल्याची दखल घेणार

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यस्तरावरुन शांततेत बंद करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांना त्याच्या सूचना दिल्या होत्या. साताऱ्यामध्ये खुर्च्या आपटण्याचा प्रकार झाला आहे. त्याला स्थानिक अधिकाऱ्यांनी मज्जाव केला आहे. कायदा व सुव्यवस्था कोणीही हाती घेवून नये, अशा सूचना महाविकास आघाडीने केल्या होत्या. मात्र, तरीही असा प्रकार घडला असेल, तर त्याची माहिती घेवून योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्री देसाई यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT