Shambhuraj Desai
Shambhuraj Desai esakal
सातारा

महाविकास आघाडी भक्कम, भाजपचं 'स्वप्न' होणार भंग

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : महाविकास आघाडीचे सरकार (Government of Mahavikas Aghadi) स्थापन झाल्यापासून भाजपचे सर्वच नेते हे सरकार कोसळण्याचे स्वप्न बघत आहेत. हे सरकार दीड वर्षे भक्कमपणाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. केंद्र सरकारकडे असलेले विषय राज्याकडे ढकलण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) नेत्यांकडून सुरु आहे, हे बरोबर नाही, असे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी व्यक्त केले. (Minister Shambhuraj Desai Criticizes BJP Leaders Satara Political News)

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे सर्वच नेते हे सरकार कोसळण्याचे स्वप्न बघत आहेत.

ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC reservation) भाजपच्या नेत्यांनी (BJP leader) सुरु केलेल्या आंदोलनासंदर्भात गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे सर्वच नेते हे सरकार कोसळण्याचे स्वप्न बघत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार दीड वर्षे भक्कमपणाने कार्यरत आहे. केंद्र सरकारकडे असलेले विषय राज्याच्या गळी उतरवायचे काम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सुरु आहे, हे बरोबर नाही.

जे विषय राज्याच्या आख्यारित आहेत ते राज्य करेल. मात्र, केंद्राचे विषय भाजपच्या नेत्यांनी केंद्र सरकारकडून मार्गी लावून घ्यावे. आमदार विनायक मेटे यांच्या संरक्षणाबाबत मंत्री देसाई म्हणाले, राज्यातील लोकप्रतिनिधींना सुरक्षा देण्यासंदर्भात राज्यात एक समिती आहे. त्या समितीच्या अहवालानुसार लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्यात येते. आमदार विनायक मेटे यांनी संरक्षण मुंबईत दिले गेले बाहेर दिले गेले नाही हा त्या समितीचा निर्णय आहे. आमदार मेटे यांना जर धोका आहे, असे समितीच्या निदर्शनास आले, तर संबंधित समितीच्या शिफारशीनुसार त्यांना तातडीने गृह विभागाकडून संरक्षण देण्यात येईल.

नरेंद्र पाटलांनी कायदा हातात घेवू नये

मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी राज्य सरकारतर्फे जे करावे लागेल त्यासाठी महाविकास आघाडी सरकार तयार आहे. खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापूरला मूक आंदोलन केले. त्याची दखल घेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना तातडीने चर्चेला बोलवले. त्यातील शासनस्तरावरील जे तातडीने मान्य करता येणे होते ते धोरण सरकारने घेतले आहे. मात्र, तरीही नरेंद्र पाटील हे हिंसक आंदोलन करणार असतील, तर कोणीही कायदा हातात घेवू नये. कायदा हातात घेवून कोणीही आंदोलन करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोणीही निर्माण करु नये, असे आवाहनही मंत्री देसाई यांनी केले.

Minister Shambhuraj Desai Criticizes BJP Leaders Satara Political News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT