Prime Minister Kisan Samman Yojana
Prime Minister Kisan Samman Yojana esakal
सातारा

किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांना लाभ द्या

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत (Prime Minister Kisan Samman Yojana) जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सदोष माहिती भरल्याने आणि प्रलंबित डेटा पडताळणीमुळे त्यांना योजनेच्या लाभापासून मुकावे लागले आहे. त्याबाबत सरकारकडून कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असा तारांकित प्रश्न उपस्थित करत वंचित शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ द्या, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांनी लोकसभेत केली. खासदार पाटील यांनी आवाज उठवल्याने कृषी मंत्रालयाने (Ministry of Agriculture) त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून, चुकांच्या दुरुस्तीसह नोंदणी पडताळणीचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल, अशी ग्वाही दिली. (MP Shrinivas Patil Demand To Provide Benefits To Farmers Under Kisan Samman Yojana bam92)

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सदोष माहिती भरल्याने आणि प्रलंबित डेटा पडताळणीमुळे त्यांना योजनेच्या लाभापासून मुकावे लागले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. काहींची नोंदणी सदोष झाल्याने त्यांच्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा होत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना योजनेचा मिळालेला नाही. संबंधित शेतकऱ्यांनी त्याची चौकशी केली असता डाटा एन्ट्रीमध्ये गावाची नावे चुकीच्या पद्धतीने भरल्याने गोंधळ झाला आहे, असे लक्षात येताच त्यांनी खासदार पाटील यांच्या निदर्शनास ती गोष्ट आणून दिली होती. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार पाटील यांनी कृषी मंत्रालयाला लेखी प्रश्न विचारला. त्यात किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकरी थेट लाभ हस्तांतरणासाठी अपात्र असल्याच्या तक्रारी आहेत. सदोष किंवा प्रलंबित डेटा पडताळणीत योजनेचा लाभ मिळत नाही. त्याबाबत सरकारकडून कोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत, असे विचारले आहे.

खासदार पाटील यांच्या मागणीवरून केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Agriculture Minister Narendrasingh Tomar) यांनी उत्तर दिले आहे. या योजनेखाली जिल्ह्यातील पाच लाख ४७ हजार ५१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी पाच लाख २९ हजार ८०० शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. नोंदणी केलेल्यांची पडताळणी पूर्ण झाली, की लाभार्थ्यांना त्याचा लाभ दिला जातो. मात्र, काही शेतकरी वंचित राहिले असल्यास राज्य शासनाकडून जिल्हा व तालुका पातळीवर अधिकारी नियुक्त करून तक्रारींची सोडवणूक केली जात असते. यासंदर्भातील तक्रारी सोडवण्यासाठी किसान पोर्टलचा उपयोग केला जाऊ शकतो. तक्रार निवारणासाठी मदत यंत्रणा समाविष्ट केली गेली आहे. याविषयी हेल्प लाईन नंबर सेवाही आहे. वंचित शेतकऱ्यांच्या नोंदणीतील चुकांची दुरुस्ती व माहितीची पडताळणी लवकर करून या योजनेचा लाभ उर्वरित लाभार्थ्यांना दिला जाईल, असे आश्वासित करण्यात आले आहे.

MP Shrinivas Patil Demand To Provide Benefits To Farmers Under Kisan Samman Yojana bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT