Onion Auction esakal
सातारा

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! लोणंदला आज कांदा लिलाव बंद राहणार? कामगार-व्यापाऱ्यांत गैरसमजाचा परिणाम

आज बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याचे लिलाव (Onion Auction) होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे.

रमेश धायगुडे

कामगारांनी कांदा पिशवीत पुन्हा भरण्यास ऐनवेळी नकार देत काम बंद ठेवल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली.

लोणंद : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Lonand Krushi Utpanna Bazar Samiti) आवारात किरकोळ कारणांवरून कामगार व व्यापारी यांच्यात झालेल्या समज-गैरसमजामुळे आज (गुरुवारी) कांद्याच्या बाजारात कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय लोणंद मार्केट यार्डातील कांदा व्यापाऱ्यांनी घेतल्याचे समजते आहे.

त्यामुळे आज बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याचे लिलाव (Onion Auction) होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. मात्र, बाजार समितीचे सभापती प्रा. सुनील शेळके- पाटील यांनी कांद्याचे लिलाव सुरूच राहावेत, यासाठी ठोस भूमिका घेत उद्या संचालक मंडळ, व्यापारी व कामगारांची तातडीची बैठक बोलावल्याचेही समजते आहे. कोणत्याही स्थितीत लिलाव सुरू ठेवण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे. मात्र, शेतकऱ्यांत याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

लोणंद मार्केट यार्डात सध्या १८०० ते २००० पिशव्यांपर्यंत कमी प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील कोणत्याच व्यापाऱ्यांना कांदा खरेदीसाठी पुरत नाही. कांद्याचे ट्रक भरती होत नाहीत. त्यातून कांद्याचे भावही चार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला तेजीत निघत आहेत. मागणीप्रमाणे कांद्याचा पुरवठा होत नाही, अशी अवस्था आहे. त्यातून येथील बाजारात कांदा विक्रीसाठी आल्यावर प्रथम कांद्याचे वजन होते. त्यानंतर तो व्यापारी काट्यावर उतरवला जातो. त्यानंतर लिलाव होतात.

लिलावाच्यावेळी फोडलेली कांद्याची पिशवी, येथील कामगार पुन्हा पिशवीत कांदा भरत असतात. मात्र, या प्रक्रियेदरम्यान अनेकदा किलो, दोन किलो कांदा लपवण्याचे प्रकार होत असल्याची तक्रार व्यापारी वर्गाकडून झाल्याने गेल्या सोमवारी (ता. चार) लिलावानंतर कामगारांनी कांदा पिशवीत पुन्हा भरण्यास ऐनवेळी नकार देत काम बंद ठेवल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे यावर ठोस निर्णय व्हावा, यासाठी व्यापाऱ्यांनी उद्या कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

पणन महामंडळाच्या नियमानुसार प्रथम व्यापारी काट्यावर आवक उतरवणे, त्यानंतर लिलाव व लिलावानंतर वजनकाटा व्हावा. जेणेकरून शेतकरी वजन होईपर्यंत आपल्या मालाजवळ थांबून राहतील आणि कांद्याच्या होणाऱ्या लपवालपवीलाही आळा बसेल, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. मात्र, ही बाब शेतकऱ्यांना त्रासदायक आहे. त्यामुळे बाजार समिती, कामगार व शेतकरीही व्यापाऱ्यांच्या या म्हणण्याला तयार नाहीत. ज्या व्यापाऱ्यांच्या काट्यावर कांदा उतरवला आहे, त्यांनीच आलेल्या मालाची काळजी घ्यावी.

त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अथवा कामगारांची नेमणूक करावी. दरम्यान, यावर निर्णयासाठी आज (गुरुवार) बाजार समितीच्या संचालक, व्यापारी व कामगार प्रतिनिधींची तातडीची बैठक बोलावल्याचे समजते आहे. मात्र, शेतकऱ्यांत याबाबत काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र, उद्या बाजारात कांद्याचे लिलाव नेहमीप्रमाणे सुरू राहतील, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

LPG दरात मोठी उलथापालथ; कोणाला मिळाला दिलासा, कोणाला नाही? घरगुती अन् व्यावसायिक सिलिंडरमध्ये मोठा फरक

Balbharati : बालभारतीकडून गणितातील चुका मान्य; ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; दुरुस्तीची ग्वाही

SCROLL FOR NEXT