सातारा

ग्रामीण भागात एसटीची सेवा मर्यादितच; जिल्ह्यात विद्यार्थी, प्रवाशांची मोठी गैरसोय

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी मुख्य शहरांना जोडणाऱ्या आणि महत्त्वाच्या ठिकाणांच्या प्रवासी सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सेवेवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे कमी भारमानाची कोणतीही नवीन बससेवा एसटीकडून सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे वडापवाल्यांची चांदी झाली आहे. 

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्‍य असलेल्या एसटीने प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी शासन निर्देशानुसार एसटीच्या सेवा महत्त्वाच्या शहरांसाठी आणि मोठ्या गावांसाठी सुरू केल्या. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारे प्रवासी एका वेळी मिळतातच असे नाही. त्यामुळे संबंधित एसटीसाठी प्रवासी संख्या पुरेसी होत नाही. त्यामुळे एसटीला यातून अपेक्षित उत्पन्नही सध्या मिळत नाही. मात्र, शासनाच्या आदेशानुसार केवळ प्रवाशांच्या सेवेसाठी ही बससेवा एसटीकडून सुरू आहे. शहरी वाहतुकीसाठी जर अशी अवस्था असेल तर ग्रामीण भागातील प्रवासी संख्येचे काय? या प्रश्नाने सध्या एसटीला घेरले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सेवा सुरू करण्याचे धाडस एसटीचे अधिकारी दाखवत नाहीत. परिमाणी प्रवाशांचा ओघ पाहून टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. सध्या मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांची सध्या मोठे हाल सुरू आहेत. एकतर एसटीने अद्यापही प्रवासी सेवा सुरू केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांची विशेषतः ज्येष्ठ, वयोवृद्ध आजारी असणाऱ्यांसह विद्यार्थी, प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्याचा विचार करून एसटी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. 

पायपीट पुजलीय पाचवीला! 

ग्रामीण भागातील दळणवळणाची महत्त्वाची सोय असलेली एसटीची सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे वाहनांची सोय नाही, असे विद्यार्थी, नोकरदार, मजूर यांना दररोज पहाटे उठून तीन ते पाच किलोमीटर पायपीट करून मुख्य रस्त्यावर यावे लागते. तेथे एसटी किंवा वाहनाची वाट बघत बसायचे. वाहन मिळाल्यावर कामावर जायचे अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे त्यांचा निम्मा वेळ प्रवासातच जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Sachin Tendulkar: सचिनच्या घरातून सिमेंट मिक्सरचा आवाज, शेजाऱ्याच्या तक्रारीनंतर आला फोन कॉल; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT