उंब्रज (जि. सातारा) : पाल ते काशीळ रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर मोठमोठे शेकडो खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारक खड्डा चुकण्याचा प्रयत्न करत अपघाताला निमंत्रण देत आहेत. याबाबत शेतकरी व प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवाशाचा जीव गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देणार का? असा संतप्त सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.
पाल ते काशीळ हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे, तसेच तारळ्यासह परिसरातील वाड्यावस्त्या येथून प्रवाशांची कायमच रहदारी असते, तसेच कऱ्हाड, सातारा येथे ये-जा करणाऱ्या लोकांची नेहमीच रहदारी सुरू असते, तर पाल (ता. कऱ्हाड) हे पश्चिम महाराष्ट्रातील मोठे देवस्थान असून, महाराष्ट्रासह इतर राज्यातूंन येथे भाविकांची रोज वर्दळ सुरू असते. तारळे परिसर हा निसर्गरम्य असल्याने तो पर्यटकांनी नेहमीच गजबजलेला असतो.
पालपासून काशीळपर्यंत शेकडो खड्डे असून, हे खड्डे दोन फूट खोलीचे पडले आहेत, तर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. हे जीवघेणे खड्डे चुकवण्यासाठी वाहनधारक कसरत करत आहेत. या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, खड्ड्यांमुळे शेतकरी व दुचाकीस्वारांच्या मणक्यांच्या विकारात वाढ झाली आहे. हे खड्डे चुकविण्याचा नादात एखादा मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागास पाल यात्रा जवळपास आल्यानंतर या रस्त्याकडे लक्ष जाते; परंतु रस्ता न करता नुसती मलमपट्टी करण्यात धन्य मानत आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.