सातारा

उद्योगपतींसाठीच मोदी सरकारनं कृषी विधेयके शेतकऱ्यांच्या बोकांडी बसविली; शेट्टींचा केंद्रावर निशाणा

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : दिल्लीमध्ये आंदोलनाला बसलेले शेतकरी एकटे नसून संपूर्ण देशातील शेतकरी त्यांच्यासोबत आहेत. हे आंदोलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे आहे. कायदेशीर हमीभाव व शेतकरीविरोधातील तीन विधेयके केंद्र सरकार मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. या आंदोलनाच्या निमित्ताने देशातील शेतकऱ्यांची एकजूट दिसल्याचेही त्यांनी नमूद केले. 

फलटण येथील न्यायलायत दाखल असलेल्या खटल्याच्या निमित्ताने शेट्टी यांच्यासह रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी मंत्री सदाभाऊ खोत, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कडाक्‍याच्या थंडीत कुडकुडत आंदोलनाला बसलेले शेतकरी एकटे नाहीत, हे आंदोलन पंजाब-हरियाणा येथील अथवा शीख शेतकऱ्यांचे आहे, असा आव केंद्र सरकार आणत आहे. परंतू, हे आंदोलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे आहे, असे स्पष्ट करुन शेट्टी म्हणाले, "केंद्र सरकारने उद्योगपतींसाठी जी तीन विधेयके शेतकऱ्यांच्या बोकांडी बसविली आहेत, त्याविरोधात देशभरात शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण व राग आहे. त्यामुळे दिल्लीत आंदोलनास बसलेले शेतकरी एकटे नसून देशातील शेतकरी त्यांच्या बरोबर आहेत हे दर्शविण्यासाठी देशभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने होत आहेत. 

या निमित्ताने देशातील शेतकऱ्यांनी आपली एकजुट दाखवून दिली आहे.'' या आंदोलनास पाठिंबा म्हणून राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आत्मक्‍लेष जागरण आंदोलन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर भरली आहे. सातारा जिल्ह्यात मात्र एक कारखाना वगळता अन्य कारखान्यांनी एफआरपी दिली नाही. शनिवारच्या (ता. 5) बैठकीत त्यावर निर्णय झाला नाही तर सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करुन सातारा येथे आंदोलन केले जाईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. यावेळी "स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, डॉ. रविंद्र घाडगे, स्वप्नील खानविलकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

शेट्टी-खोत एकत्र; एकमेकांकडे पाहणेही टाळले

ऊस आंदोलनातील 2013 साली दाखल झालेल्या खटल्याच्या निमित्ताने शेतकरी संघटनेतील दोन दिग्गज नेते "स्वाभिमानी'चे राजू शेट्टी व "रयत क्रांती'चे माजी मंत्री सदाभाऊ खोत हे फलटण येथे एकत्र आले होते. न्यायालयातील बार रुममध्ये हे दोन्ही नेते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत एक तासापेक्षाही अधिक काळ होते. केवळ काही फूट अंतरावर बसलेल्या या दोघांनी एकमेकांशी बोलणे सोडा, बघणेही टाळले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT