Prakash Ambedkar vs Ramdas Athawale esakal
सातारा

'तुमच्यासाठी मी स्वतः अध्यक्षपद सोडायला तयार, RPI मध्ये या'; रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर

Ramdas Athawale vs Prakash Ambedkar : मी दिलेल्या ऑफरवर प्रकाश आंबेडकर कधीही भाष्य करत नाहीत. त्यांनी एक पाऊल पुढे टाकावे.

सकाळ डिजिटल टीम

''वंचित बहुजन आघाडी ही डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बरखास्त करून डॉ. बाबासाहेबांचे वारस म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मूळ पक्षात सामील व्हावे.''

सातारा : वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे. यामुळे आपल्या पक्षाची राज्यात ताकद वाढेल. तुमच्यासाठी मी स्वतः अध्यक्षपद सोडायला तयार आहे, असे खुले निमंत्रण केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिले.

रिपब्लिकन पक्षाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त मंत्री आठवले येथे आले होते. या वेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, कार्याध्यक्ष बाबूराव कदम, सरचिटणीस गौतम सोनवणे, पर्यावरण विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण ढमाळ, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते.

आठवले म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन ऑफ इंडिया व मजूर पार्टी या दोन पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना महाराष्ट्रात यश आले नाही. त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी स्थापलेला पक्ष हा खरा रिपब्लिकन पक्ष आहे. आता आमच्या पक्षातील अन्य गटातटांनी मतभेद विसरून मूळ रिपब्लिकन पक्षांत सामील व्हावे. यामुळे राज्यात आपले राजकीय ऐक्य वाढेल.

वंचित बहुजन आघाडी ही डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बरखास्त करून डॉ. बाबासाहेबांचे वारस म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मूळ पक्षात सामील व्हावे. त्यांनी स्वतः राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे. त्यांच्यासाठी मी अध्यक्षपद सोडायला तयार आहे. मी दिलेल्या ऑफरवर प्रकाश आंबेडकर कधीही भाष्य करत नाहीत. त्यांनी एक पाऊल पुढे टाकावे. त्यांच्या पुढचे एक पाऊल टाकायला मी तयार आहे.’’

राज्यात आठ जागा द्याव्यात

महायुतीने विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या तीन प्रादेशिक विभागात आठ जागा द्याव्यात. दोन महामंडळे आणि विधान परिषदेच्या १२ आमदारांमध्ये एक जागा रिपाईला सोडावी, अशी आमची मागणी असल्याचे सांगून रामदास आठवले म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या १७० जागा निवडून येतील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण संपविण्याची भाषा केली आहे. त्याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकांत बसेल. राज्यात काँग्रेसला यश मिळणार नाही.’’

फलटणची जागा रिपाइंला द्या

जिल्ह्यामध्ये फलटण विधानसभा मतदारसंघाची आरक्षित जागा रिपाइंला मिळावी, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. केंद्र शासनाने समान नागरी कायदा आणि वक्फ बोर्ड कायदा आणण्याची तयारी चालवली आहे. हे दोन्ही कायदे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत. वक्फ बोर्ड कायदा हा प्रस्थापितांची एकाधिकारशाही मोडून मुस्लिम समाजाला फायदा करून देणारा कायदा आहे. समान नागरी कायद्यामुळे हिंदू व मुस्लिम समाजामध्ये संबंध समन्वयाचे राहणार आहेत. या कायद्याविषयी गैरसमज पसरवला जाऊ नये, असेही मंत्री आठवले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT