सातारा

लवकरच महावितरण कार्यालयास टाळे ठोकणार; अशाेक गायकवाडांचा इशारा

प्रवीण जाधव

सातारा : कोरोना काळात टाळेबंदी असूनही शेतकरी, छोटे व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना आलेली भरमसाट वीजबिले माफ केली नाहीत तर महावितरण कंपनी कार्यालयास टाळे ठोका आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी नुकताच दिला.
 
गायकवाड म्हणाले, ""मुंबई आयआयटी या देशपातळीवर नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेने सर्वेक्षण करून महावितरणचा फसव्या वीजबिलांचा घोटाळा बाहेर काढला आहे. त्यातून अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. राज्यात दोन कोटी वीज ग्राहक व 43 लाख कृषी पंपधारक आहेत. त्यांच्या बिलात घोटाळा झाला आहे. भरमसाट वीजबिले माथ्यावर मारली जात आहेत. ऊर्जामंत्र्यांनी 100 युनिटपर्यंत बिले माफ करण्याचे जाहीर केले होते. त्याचे पुढे काय झाले माहीत नाही.'' महावितरणने लवकरात लवकर वीजबिल माफ न केल्यास महावितरण कंपनीलाच टाळे ठोकणार, असा इशाराही त्यांनी दिला.

बंद असलेल्या शाळा तातडीने सुरू करा; शिक्षणाधिकाऱ्यांची शाळा व्यवस्थापनाला सूचना

या वेळी आप्पा तुपे, श्रीकांत निकाळजे, जयवंत वीरकायदे, सिध्दार्थ कांबळे, उत्तम कांबळे, युवराज काटरे, राजू लादे, अजित गायकवाड, किशोर गालफाडे, सचिन वायदंडे, वैभव गायकवाड, आदित्य गायकवाड, अशोक मदने, एकनाथ रोकडे, जग्गी कांबळे आदी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ...तर राजकारण सोडून देईन, अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील जंतरमंतरवरून आव्हान

AI in Army : आता 'फौजी' बनणार AI! सॅम ऑल्टमननी सैन्याशी केली हातमिळवणी, नेमकं तंत्रज्ञान काय? पाहा

Latest Marathi News Update : कांद्याला कवडीमोल भाव; विंचूरमध्ये स्वाभिमानीचा ‘रस्ता रोको’

Satara Robbery: कामावरून काढलं अन् टाकला दराेडा! अंगडिया कर्मचाऱ्याकडून लुटले ३२ लाखांचे दागिने, साताऱ्यातील दराेड्याप्रकरणी नेमकं काय घडलं..

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT