सातारा

सदाभाऊंचा सरकारवर घणाघात; शेतक-यांना मदत म्हणजे काेपराला गूळ लावून हाताने चाटणं

सिद्धार्थ लाटकर

सातारा : काेराेनाच्या संकटात शेतकरी उध्वस्त झाला आहे. यंदा दिवाळी ही शेतक-यांची कडू झाली आहे. सरकारने दहा हजार काेटीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामधून ग्रामीण रस्ते, पाटबंधारे, पाणीपूरवठा विभाग या सर्वांना निधई विभागून दिला ाहे. शेतक-यांच्या वाट्याला केवळ पाच हजार काेटी येतील हे म्हणजे काेपराला गूळ लावायचा आणि हातानं चाटायचा अशीच राज्य सरकारची शेतक-यांना मदत आहे अशी घणाघाती टीका माजी मंत्री सदाभाऊ खाेत यांनी क-हाड येथे नुकतीच केली.

ते म्हणाले, राज्यसरकारकडून देण्यात येणारी मदत ही शेतक-यांवर अन्याय करणारी आहे. फळलागवड असणा-या शेतक-यांला प्रतिहेक्टरी एक लाख रुपये देणे आवश्यक आहे. बागायत उत्पादक शेतक-यांना 50 हजार तर काेरडवाहूसाठी 25 हजार रुपये देणे आवश्यक आहे. 

सदाभाऊ खोत यांचा केंद्राला घरचा आहेर

दिवाळी ताेंडावर आली आहे. त्यामुळे घाेषणा नकाे तर लवकर मदत देवून राज्यसरकारने मेहरबानी करावी असेही खाेत यांनी नमूद केले. दरम्यान सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती राज्य सरकारच्या वर्मावर बाेट ठेवून बाेलत असेल तर त्यांच ताेंड बंद करण्यासाठी जून प्रकरण उकरुन काढून अटक केली जात आहे. राज्यामध्ये अशी कितीतरी प्रकरण आहेत. ज्यांच्या चाैकशी वर्षानुवर्षा चाललेल्या आहेत परंतु त्यावर ठाेस कारवाई हाेत नाही असेही खाेत यांनी नमूद केले.

Video : सहकारमं-यांच्या शिष्टाईनंतर राज्यातील शेतकऱ्यांचे उपोषण मागे

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

PIFF Mahotsav : ‘पिफ’ १५ जानेवारीपासून रंगणार; सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार

होता स्‍कार्फ म्‍हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्..

सोलापूर जिल्ह्यात 2 वर्षात 1350 जणांचा अपघाती मृत्यू! दुपारी 4 ते रात्री 12 या वेळेत सर्वाधिक अपघात; ‘या’ 5 महिन्यात अपघाताचे प्रमाण जास्त

लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत! महापालिकेत लाडक्या बहिणींचे मतदान आपल्यालाच मिळावे म्हणून भावी नगरसेवकांकडून मोफत ‘ई-केवायसी’ शिबिरे

SCROLL FOR NEXT