Safe Kelghar Ghat in bad condition due negligence of construction department  sakal
सातारा

सुरक्षित केळघर घाटातील वाट बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बिकट

संरक्षक कठडे व रेलिंग नसल्याने अपघातांना मिळते निमंत्रण; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

संदीप गाडवे

केळघर : वाहतुकीस अत्यंत सुरक्षित म्हणून ओळखला जाणाऱ्या केळघर घाटातील वाट बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बिकट झाली आहे. नागमोडी वळणे असलेल्या घाटात काही ठिकाणी संरक्षक कठडे व रेलिंग नसल्याने अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे.

सातारा व रायगड या जिल्ह्यांना जोडणारा रस्ता म्हणून केळघर घाटाला कोकणात जाणाऱ्या प्रवासी, वाहनचालकांची सर्वाधिक पसंती आहे. गेल्या वर्षी २२ व २३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटात रेंगडी येथे एकाच घरातील चार आणि वाटंबे येथील एकाचा पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. विटा ते महाबळेश्वर या राज्यमार्गाचे चारपदरीकरणाचे काम सध्या गतीने सुरू आहे. मात्र, हे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असून, या ठेकेदाराला रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेची थोडीशीही कदर नाही. बांधकाम विभागाने खरे तर या कामावर लक्ष ठेवणे आवश्यक असताना बांधकाम विभाग ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने या ठेकेदारावर कुणाचाही वचक नसल्याने मनमानी पध्दतीने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

केळघर घाटात अवघड वळणांवर संरक्षक कठडे व रेलिंग नसल्यामुळे अपघातांची शक्यता जास्त आहे. घाटातील काम सुरू असताना ठेकेदाराने मोऱ्यांचे काम सदोष केलेले आहे. पाण्याचा निचरा पुरेसा न होईल अशा पद्धतीने मोऱ्या बांधल्या आहेत. रेंगडी दुर्घटनेदरम्यान मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे आले असताना घाटातील मोऱ्यांची उंची वाढवण्याबाबत ग्रामस्थांनी लेखी निवेदन देऊनसुद्धा ठेकेदाराने या कामाकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. रस्त्याचे काम करताना राडा-रोडा रस्त्याच्या कडेला टाकल्याने मोठमोठे दगड शेतीत जाऊन शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. घाटात संरक्षक कठडे व रेलिंग बसवण्याचे काम पावसापूर्वी होणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात या घाटात अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

केळघर घाटात रस्ता रुंदीकरणाचे काम ठेकेदाराने निकृष्टपणे केले आहे. घाटात संरक्षक कठडे व रेलिंग नसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. बांधकाम विभागाने योग्य त्या उपाययोजना पावसाळ्यापूर्वी कराव्यात.

-दत्तात्रय बेलोशे, सामाजिक कार्यकर्ते, केळघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT