Satara 
सातारा

पाचगणीत शेतकऱ्यांना भाजीविक्रीस अटकाव, प्रस्थापितांकडून हुसकावून लावण्याचा प्रयत्नही

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : कोरोनाचा कहर व लॉकडाउनच्या परिस्थितीत ग्राहक व बाजारपेठेच्या कमतरतेने शेतकरी पूर्णपणे कोलमडला असताना मिळेल त्यात समाधान मानून नुकसान टाळण्यासाठी शेतात पिकवलेला माल स्वतः शेतकरी पाचगणी बाजारपेठेमध्ये जावून विकत आहेत. मात्र, काही प्रस्थापित भाजीविक्रेते या शेतकऱ्यांना भाजी विकण्यास अटकाव करत असल्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचगणी या गिरिस्थानाच्या परिसरातील गावांत स्ट्रॉबेरी, फराशी, बटाटा, वाटाणा, घेवडा, मुळा, गाजर, मेथी अशा प्रकारच्या विविध भाज्या शेतकरी घेतात. पूर्वी या भाज्या हा शेतकरी इतर बाजारपेठांतील व्यापाऱ्यांना होलसेल दरात विकत असत. परंतु, सध्या लॉकडाउनचे काही निर्बंध आणि कोरोनाच्या महाभयंकर संसर्गित रोगाच्या काळात ग्राहकांअभावी मालाचे मोठे नुकसान होत आहे.

काही वेळा हा माल शेतातच सडून जात आहे. मार्चपासून देशात लॉकडाउन घोषित झाला आहे. त्यानंतर पहिले काही दिवस शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला. कारण, शेतमाल विकण्याची जुनी साखळी विस्कळित झाली होती. त्यामुळे भाज्या व फळे शेताच्या बांधावर सडू लागली होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांचे अवसान गळाले होते. तर काहींनी सावरत वेगळे मार्ग काढले. त्यांनी स्वत: शहरात आणि शेजारच्या गावांत जाऊन सरळ ग्राहकांना शेतमाल विकायचे ठरवले. परंतु, सध्या बंद परिस्थितीत आर्थिक गणितही कोलमडल्याने हतबल झालेला शेतकरी सध्या बाजारात स्वतः जावून माल विकण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु, बाजारपेठेतील प्रस्थापित भाजी व्यापारी या शेतकरी वर्गाला माल विकण्यासाठी अटकाव करत आहेत तर काही वेळा दमदाटी करून त्यांना बाजारातून हुसकावून लावत आहेत. हा या शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे. 

पाचगणी बाजारपेठ तशी छोटी आहे. त्यामुळे मोजकेच भाजी व्यापारी कार्यरत आहेत. शाळा, हॉटेल यांना तसेच किरकोळ विक्रीवर त्यांची गुजराण आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात पिकवलेला माल बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणण्यासाठी कसलीही परवानगीची गरज नाही. परंतु, पाचगणी येथील तथाकथित प्रस्थापित भाजी व्यापाऱ्यांचा सोस या शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. आपला माल विकून होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकरी जिवाचा आटापिटा करत आहेत. कुटुंबाची होत असणारी आर्थिक कोंडी फोडण्यासाठी चाललेली त्यांची ही धडपड बाजारातील जुन्या व्यापाऱ्यांकडून हाणून पाडली जात आहे. प्रसंगी हे व्यापारी त्यांना दमदाटी करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

""आपल्या शेतातील भाजी बाजारात विकणे, हा त्या शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यांना कुणीही माल विकण्यासाठी मज्जाव करू शकत नाही. तो कुठेही माल विकू शकतो. अशा शेतकऱ्यांना जर कोणी दमदाटी केल्याचे आढळल्यास आम्ही त्यांना आमचा हिसका दाखवू.'' 

-दीपक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT