Satara Latest Marathi News 
सातारा

साफसफाईच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; शाहूनगरातील 35 जणांवर गुन्हा

गिरीश चव्हाण

सातारा : शाहूनगर येथील जगतापवाडी परिसरातील आमराई अपार्टमेंटच्या परिसरात काल सायंकाळी रस्ता, तसेच साफसफाईच्या कारणावरून दोन गटांत वादावादी, हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदविल्या असून, यानुसार 35 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

शाहूनगर येथील आमराई रेसिडेन्सीमध्ये गौरी बाळासाहेब जगताप या राहत असून, त्यांनी नोंदविलेल्या फिर्यादीत अनिल महादेव जाधव, प्रकाश एकनाथ बोधे, उषा भीमराव निकम, संगीता अनिल जाधव, वनिता दत्तात्रय इंगळे व 30 जणांनी (सर्व रा. आमराई रेसिडेन्सी) यांनी काल जागेची साफसफाई करण्यासाठी जेसीबी बोलावल्याच्या कारणावरून गोंधळ घालत मारहाण केल्याचे म्हटले आहे. 

संगीता अनिल जाधव (रा. आमराई रेसिडेन्सी) यांनी नोंदविलेल्या फिर्यादीत गणेश बाळासाहेब जगताप, गौरी बाळासाहेब जगताप, कमल बाळासाहेब जगताप, जेसीबी चालक व एका महिलेने काल जेसीबीने अपार्टमेंटचा मुख्य रस्ता खोदत बंद केला. याबाबत विचारणा करण्यासाठी अपार्टमेंटमधील रहिवाशांसमवेत गेले असता, गणेश जगताप व इतरांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याचे नमूद केले आहे. याचा तपास उपनिरीक्षक रोकडे करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे पोलिसांकडून अधिकाराचा गैरवापर, स्वत:ची चूक झाकण्यासाठी निरपराधाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं; हायकोर्टानं फटकारलं

कराड तालुका हादरला! चाकूच्या धाकाने युवतीवर अत्याचार;संशयिताकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलची धमकी, चौघांवर गुन्हा..

Latest Marathi news Update : BCCIचे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंह बिंद्रा यांचं निधन

Padma Awards 2026 : पद्म पुरस्कार जाहीर: महिलांचा सन्मान, परदेशी नागरिकांचा गौरव; धर्मेंद्र, अच्युतानंदन यांना पद्मविभूषण

Republic Day 2026 : देशातील ४१ गावं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच साजरा करणार प्रजासत्ताक दिन, कारणही आहे खास

SCROLL FOR NEXT