Satara Latest Marathi News 
सातारा

चिंताजनक! चैनीसाठी अल्पवयीन मुलांनी चोरल्या 13 सायकली; साताऱ्यातील टोळी गजाआड

प्रवीण जाधव

सातारा : अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत असलेला वाढता सहभाग सायकल चोरीच्या प्रकरणातून पुन्हा समोर आला. केवळ चैनीसाठी होणारे हे गुन्हे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या आयुष्यावर परिणाम करत आहेत. त्यामुळे मुलांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांना पार पाडावी लागणार आहे. त्याचबरोबर शाळा व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुलांना अशा गैरकामांपासून दूर ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 

वयात येताना मुलांमध्ये शारीरिक, मानसिक बदल होतात. या काळातच मुले चांगल्या किंवा वाईट मार्गावर जाताना दिसतात. सळसळते रक्त, त्याचबरोबर चैनीच्या जीवनाचा विविध माध्यमातून त्यांच्या मनावर सातत्याने आघात होतात. त्याचा साहजिकच लहान मुलांच्या मनावर मोठा परिणाम होताना दिसतो. नको त्या जीवनशैलीकडे, त्याचबरोबर न परवडणाऱ्या गोष्टींची हौस भागविण्यासाठी त्यातूनच मुले गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत. विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आजवर पोलिसांनी पकडलेल्या गुन्ह्यांमध्ये अनेकदा अल्पवयीन मुलांचा समावेश समोर आला आहे. आर्थिक चणचण पूर्ण करण्यासाठी मारामारी, गुंडगिरी करून पैसे मिळवण्याच्या जाळ्यात काही जण आपसूक अडकले जाताना दिसतात. विशेष म्हणजे दुचाकी व सायकल चोऱ्या करून त्यातून चैनीसाठी पैसे जमा केले जातात. काही जण केवळ गाड्या चालविण्याची हौस म्हणूनही चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे. 

या मुलांमध्ये काही चांगल्या घरातील मुलांचाही समावेश आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने साताऱ्यातील सायकल चोरी करणारी टोळी समोर आणली. परंतु, ती दोन्हीही अल्पवयीन मुले आहेत. त्यांच्याकडून 13 सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आठ ते दहा हजार रुपये किमतीच्या सायकली त्यांनी चोरल्या होत्या. या सायकलींची त्यांनी दोन-तीन हजारांपर्यंत विक्री केली. हा पैसा त्यांनी केवळ चैनी व मौजमजा करण्यासाठीच वापरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. परंतु, या मौजमजेपायी यांच्या संपूर्ण आयुष्यावर गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे या मुलांचे योग्य समुपदेशन करणेही आवश्‍यक आहे. त्याचबरोबर पालकांनी पाल्यांकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. मुलांच्या वागण्यामध्ये, त्याच्या वापरण्याच्या वस्तू तसेच खाण्याच्या पद्धतीत झालेले बदल त्यांना वेळीच टिपता आले तर, त्यांना गुन्हेगारीच्या जाळ्यात खेचले जाण्यापासून रोखता येऊ शकेल. त्याचबरोबर शाळा व सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही त्यासाठी विशेष उपक्रम राबविणे आवश्‍यक आहे.

पालकांकडे नाही पुरेसा वेळ 

मुलांना चूक काय व बरोबर काय, हे सांगायला पालकांकडे पुरेसा वेळ नाही, अशी परिस्थिती आहे. आजूबाजूच्या निरीक्षणातून ते कोणत्याही गोष्टीकडे विशेषतः वाईटाकडेच जास्त आकर्षित होतात. अगदी खाऊसाठीही मुले चोरीच्या मोहात अडकतात. हे थांबण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी मुलांकडे बारकाईने लक्ष दिलेच पाहिजे. चांगली मुले घडवणे ही समाजाचीही जबाबदारी असते. त्यामुळे आपल्या आसपासच्या मुलांवर लक्ष ठेवून त्यांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी आवश्‍यक ती माहिती त्यांच्या पालकांपर्यंत पोचविण्याचे कामही नागरिकांनी करणे आवश्‍यक आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या ऍड. मनीषा बर्गे यांनी नमूद केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT