राज्य शासनाविरोधात 'बळीराजा' आक्रमक; कऱ्हाडात धरणे sakal
सातारा

राज्य शासनाविरोधात 'बळीराजा' आक्रमक; कऱ्हाडात धरणे

राज्य शासनाने नियमित कर्जदारांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले होते.

हेमंत पवार

कऱ्हाड : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना शेतीचे उत्पादन दुप्पट करणार, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देणार या घोषणा केल्या. राज्य शासनाने नियमित कर्जदारांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र दोन वर्षानंतरही काहीच झालेले नाही. याचा निषेध नोंदवत महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन बळीराजा शेतकरी संघटनेने त्यांच्या कोल्हापुर नाक्यावरील पुतळ्यासमोर आज धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

धरणे आंदोलनात बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, आंदोलनात केंद्रीय चंद्रकांत यादव, विश्वास जाधव, सागर कांबळे, पोपट थोरात, उत्तम खबाले, इम्रान पटेल आदी पदाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी श्री. पाटील म्हणाले, केंद्र व राज्य सरकार हे शेतकऱ्यांसाठी फसव्या घोषणा करत आहे. त्याची कोणतीही अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे जगणे मुश्किल बनले आहे.

केंद्र सरकारने शेतीमालाचे उत्पादन दुप्पट करुन उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याची घोषणा केली होती. राज्य सरकारने सत्तेत आल्यानंतर नियमित कर्जदारांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्याला दोन वर्षे झाली शेतकऱ्यांना दमडीचीही मदत मिळालेली नाही. नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला राज्य सरकारने पानेच पुसली आहेत. केवळ फसण्या घोषणा केंद्र व राज्य शासनाकडुन करण्यात आल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारला गांधी जयंतीदिनी तरी चांगली बुद्धी मिळावी व शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी प्रार्थना यावेळी संघटनेकडून करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Break-Free Toll Plaza : देशातील पहिला ‘ब्रेक फ्री’ टोल प्लाझा ‘या’ राज्यात झाला तयार! ; २ फेब्रुवारी पासून चाचण्या सुरू

Navjot Kaur Sidhu quits Congress : पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये मोठी घडामोड! ; नवज्योत कौर सिद्धू यांनी अखेर सोडला पक्ष

IND vs NZ, 5th T20I: भारतीय संघाने मैदान मारलं, न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय मिळवला; इशान किशनच्या शतकानंतर अर्शदीपच्या ५ विकेट्स

Railway Toilet Incident Video : "गेट तोडा नाहीतर मी मरेन..." ; माजी मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार अडकले रेल्वेच्या शौचालयात!

Manoj Jarange: रस्ता काट्यांना भरलेला, गिधाडांपासून सावध राहा, मनोज जरांगेंच्या सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT