सातारा  sakal
सातारा

सातारा : ‘जलजीवन’ची ३१६ गावांत कामे पूर्ण

जिल्ह्यात २४५ कामे अंतिम टप्‍प्यात; २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जलजीवन मिशनअंतर्गत योजनेत सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३१६ गावांत पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्णत्वास आली आहेत. २४५ गावांतील कामे अंतिम टप्‍प्यात आहेत. या योजनेद्वारे प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी मिळणार असून जिल्ह्यातील सुमारे पाच लाख ७७ हजार ४३ कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.

ग्रामीण भागात पिण्याचे शुध्द व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, गावातील महिलांचा पाणी आणण्याचा त्रास कमी व्हावा, या उद्देशाने गावातील प्रत्येक घरात नळजोडणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. २०२४ पर्यंत ‘हर घर जल से नल’ हे घोषवाक्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. या योजनेतील कामासाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा आहे. त्यानुसार गावोगावी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामीण भागात तर शहरी भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात पाच लाख ७७ हजार ४३ कुटुंबे असून आतापर्यंत सुमारे चार लाख ७५ हजार ६०४ कुटुंबांना नळ कनेक्शन दिली आहेत. जलजीवन मिशनमध्ये पुणे विभाग राज्यात आघाडीवर असून सातारा जिल्हा अग्रेसर आहे. याचबरोबर १७५ योजनांना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग व गटविकास अधिकाऱ्यांमार्फत निधीही वितरित केला आहे. जलजीवन मिशनमुळे जिल्ह्यातील दुर्गम व डोंगरी भागातील नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळणार आहे.

जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात शंभर टक्के नळजोडणी केली जाणार आहे. या योजनेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी दर आठवड्याला पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची तालुकानिहाय बैठका घेऊन योजनानिहाय सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. प्रस्तावित कामेही मार्गी लावली जात आहेत.

-विनय गौडा,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठरलं तर मग! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचा बार 'या' दिवशी उडणार, उदयपूरमध्ये होणार शाही विवाहसोहळा

Tragic Incident Kolhapur : कोल्हापूर जवळील प्रयाग चिखलीतील अवघ्या १५ वर्षीय मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, आई वडील बाहेरगावी गेले अन्

Latest Marathi News Live Update :मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील- मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

CA Success Story: आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत ओंकार झाला ‘सीए’; आई-वडील, बहिणीच्या डाेळ्यातून आनंद अश्रू, संघर्षमय यशाचे कौतुक

Mahabharat War: कसं घडलं महाभारातातील युद्ध? AI LIVE रिपोर्टींग VIRAL, ५१४२ वर्षे मागे जाल, साक्षात कृष्ण-अर्जुन सर्वांना पाहाल

SCROLL FOR NEXT