उंडाळे (जि. सातारा) : शेतकऱ्यांची शेतीपंप व घरगुती वीजबिल माफ करावे. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नये. कोणी कर्मचारी कनेक्शन तोडण्यासाठी पोलवर चढल्यास त्याला बळीराजा शेतकरी संघटना अडवणार, असा इशारा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आज महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.
महवितरणाच्या उंडाळेतील कार्यालयावर शेतकऱ्यांनी वीजबिल माफी द्यावी, कनेक्शन तोडू नये, यासाठी आंदोलन केले. पंजाबराव पाटील, धनाजीराव पाटील, उदय पाटील, श्रीकांत पाटील, मिलिंद पाटील, विकास शेवाळे, प्रमोद पाटील, अजित पाटील, अशोक पाटील, सुधीर पाटील, धनाजी कदम, धनाजी देशमुख यासह शेतकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. निवेदनात तीन वर्षांत अतिवृष्टीमुळे व एक वर्षभर कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
शेतकऱ्याला शेतीसाठी सरकारकडून आर्थिक मदतीची गरज असताना सरकार आपण वीजबिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहात. शेतकऱ्यांनी घरगुती व शेती वीजबिले न भरल्याने वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू केले आहे. ते पूर्णतः थांबून संपूर्ण वीजबिल माफ करण्यात यावे, शेतीपंपाचे वीजबिले रीडिंगप्रमाणे देण्यात यावीत, येळगाव शेती फिडर हा एमईआरसी फिडर जाहीर केला आहे तो पूर्वीप्रमाणे करावा, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना आपल्या स्टाईलने महावितरणला धडा शिकवेल व तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा दिला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.