Satara Latest Marathi News 
सातारा

वाह, क्या बात है! बहुल्यात शेतकऱ्यांनी बांधले तब्बल 41 बंधारे; 68 विहिरींच्या पाणीपातळीत मोठी वाढ

विलास माने

मल्हारपेठ (जि. सातारा) : ओढ्याच्या वाहून जाणाऱ्या पाण्याला दगड-माती, पालापाचोळ्याच्या सहाय्याने ठिकठिकाणी अडवून बहुले येथे 41 माती बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातून 68 विहिरींची पाणीपातळी वाढल्यामुळे बहुले गावात पाणी अडवा-पाणी जिरवा योजना यशस्वी झाली आहे. शासनाच्या लघुपाटबंधारे, सिंचन विभागाकडून 60 लाखांचा निधी त्यासाठी देण्यात आला आहे. 

तालुक्‍यातील कोयना नदीकाठच्या काही गावांनाही आजही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जुन्या उपसा जलसिंचन योजना मोडीत निघाल्यामुळे शेती पाण्याविना उपाशी राहिली आहे. यापैकीच बहुले, पाळेकरवाडी, जरेवाडी परिसर उपसा योजनेपासून वंचित राहिला. काही विहिरींमुळे परिसर ओलिताखाली असला तरीही नोव्हेंबरनंतर पाणीपातळी खालावते. 

यामुळे बहुलेच्या पाळेकरवाडी, जरेवाडी व हावळेवाडीकडून वाहत येणाऱ्या पूर्व आणि पश्‍चिम बाजूने वाहत असलेल्या गावओढ्यावर पहिल्या वर्षी 11, गेल्या वर्षी 13 आणि यंदा 17 असे एकूण 41 मातीचे बंधारे लोकसहभागातून करण्यात आले आहेत. बहुलेचे शेतकरी राजू पाटील, मानसिंग पानस्कर, सर्जेराव पानस्कर, भरत पवार, भरत पानस्कर, काकासाहेब पाटील, पांडुरंग डवरी, अशोक पवार, अंकुश पानस्कर, राजेंद्र पानस्कर यांनी सहकार्य केले. त्यातून उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. 

"सिंचनाचे महत्त्व लोकांना पटले असून, सर्वजण सहकार्य करत आहेत. त्यातूनच आम्ही 41 बंधारे बांधल्याने 68 विहिरींची पाणीपातळी वाढली आहे.'' 

-राजू पाटील, शेतकरी, बहुले 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT