Satara Latest Marathi News 
सातारा

पाटण तालुक्‍यात वणव्यांचा भडका; नैसर्गिक वनसंपदा संपुष्टात येण्याची भीती

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यात वनक्षेत्र असलेल्या गावांच्या ठिकाणी वनसरंक्षण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामार्फत वनांचे रक्षण केले जाते. मात्र, गावोगावी स्थापन केलेल्या या वनसरंक्षण समित्या कागदावरच असल्याने त्यांचा उद्देश सफल होताना दिसत नाही. परिणामी, वनक्षेत्रात लागलेल्या वणव्यामुळे परिसरातील डोंगर काळेकुट्ट दिसत असून वनसंरक्षण समित्या कुचकामी ठरल्या आहेत. वणवे टाळण्यासाठी वन विभागाने वन संरक्षण समितीबरोबर लोकांच्या जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. 

पाटण तालुक्‍याला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. डोंगरदऱ्यांनी विखुरलेला हा भाग आता वणव्यामुळे काळाकुट्ट दिसत आहे. या आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, त्यांची अंडी, घरटी जळून खाक होत आहेत. पावसाळ्यात गवत चांगले येते म्हणून ग्रामीण भागात हे वणवे लावले जातत. या वणव्यांना आळा घालण्यासाठी वन विभागाच्या वतीने गावोगावी वन संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत आहेत. 

या समितीतील कार्यकारी मंडळ या वनांची देखभाल करत असते. गवत व अन्य मार्गाने निधी गोळा केला जातो. त्या माध्यमातून जाळरेषा काढणे, आग लागल्यानंतर माहिती संबंधित विभागाला देणे, वणवे लावण्यावर आळा घालणे अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. मात्र, दिवसोंदिवस या वन संरक्षण समित्यांचे वणव्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पाटण तालुक्‍यातील डोंगरावरील वनसंपदेला पुन्हा वणव्याची झळ बसू लागली आहे. वारंवार डोंगराला आग लागण्याच्या घटनांमुळे नैसर्गिक वनसंपदा संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

आगीची माहिती अनेक वेळा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना नसते. काही वेळा डोंगरावरील आग विझविण्यासाठी ते धावपळ करतात. मात्र, तोपर्यंत अनेक लहान-मोठी झाडे आगीत जळून खाक झालेली असतात. गावोगावी स्थापन केलेल्या या वन सरंक्षण समित्या कागदावरच असल्याने त्यांचा उद्देश सफल होताना दिसत नाही. वणवे टाळण्यासाठी वन विभागाने वन सरंक्षण समितीबरोबर लोकांच्या जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. 

वृक्षलागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात 

पाटण तालुक्‍यात शासनामार्फत पावसाळ्यात वृक्षलागवड मोहीम हाती घेतली जाते. मोठा गाजावाजा करून वृक्षलागवड होते. त्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असते. मात्र, लावलेल्या झाडांचे, रोपट्यांचे वन विभागाकडून जतन आणि संरक्षण होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाचा हा खर्च पाण्यात जात असल्याची वस्तुस्थिती आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT