Satara Latest Marathi News 
सातारा

पाटण तालुक्‍यात वणव्यांचा भडका; नैसर्गिक वनसंपदा संपुष्टात येण्याची भीती

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यात वनक्षेत्र असलेल्या गावांच्या ठिकाणी वनसरंक्षण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामार्फत वनांचे रक्षण केले जाते. मात्र, गावोगावी स्थापन केलेल्या या वनसरंक्षण समित्या कागदावरच असल्याने त्यांचा उद्देश सफल होताना दिसत नाही. परिणामी, वनक्षेत्रात लागलेल्या वणव्यामुळे परिसरातील डोंगर काळेकुट्ट दिसत असून वनसंरक्षण समित्या कुचकामी ठरल्या आहेत. वणवे टाळण्यासाठी वन विभागाने वन संरक्षण समितीबरोबर लोकांच्या जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. 

पाटण तालुक्‍याला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. डोंगरदऱ्यांनी विखुरलेला हा भाग आता वणव्यामुळे काळाकुट्ट दिसत आहे. या आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, त्यांची अंडी, घरटी जळून खाक होत आहेत. पावसाळ्यात गवत चांगले येते म्हणून ग्रामीण भागात हे वणवे लावले जातत. या वणव्यांना आळा घालण्यासाठी वन विभागाच्या वतीने गावोगावी वन संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत आहेत. 

या समितीतील कार्यकारी मंडळ या वनांची देखभाल करत असते. गवत व अन्य मार्गाने निधी गोळा केला जातो. त्या माध्यमातून जाळरेषा काढणे, आग लागल्यानंतर माहिती संबंधित विभागाला देणे, वणवे लावण्यावर आळा घालणे अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. मात्र, दिवसोंदिवस या वन संरक्षण समित्यांचे वणव्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पाटण तालुक्‍यातील डोंगरावरील वनसंपदेला पुन्हा वणव्याची झळ बसू लागली आहे. वारंवार डोंगराला आग लागण्याच्या घटनांमुळे नैसर्गिक वनसंपदा संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

आगीची माहिती अनेक वेळा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना नसते. काही वेळा डोंगरावरील आग विझविण्यासाठी ते धावपळ करतात. मात्र, तोपर्यंत अनेक लहान-मोठी झाडे आगीत जळून खाक झालेली असतात. गावोगावी स्थापन केलेल्या या वन सरंक्षण समित्या कागदावरच असल्याने त्यांचा उद्देश सफल होताना दिसत नाही. वणवे टाळण्यासाठी वन विभागाने वन सरंक्षण समितीबरोबर लोकांच्या जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. 

वृक्षलागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात 

पाटण तालुक्‍यात शासनामार्फत पावसाळ्यात वृक्षलागवड मोहीम हाती घेतली जाते. मोठा गाजावाजा करून वृक्षलागवड होते. त्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असते. मात्र, लावलेल्या झाडांचे, रोपट्यांचे वन विभागाकडून जतन आणि संरक्षण होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाचा हा खर्च पाण्यात जात असल्याची वस्तुस्थिती आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

PIFF Mahotsav : ‘पिफ’ १५ जानेवारीपासून रंगणार; सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार

होता स्‍कार्फ म्‍हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्..

सोलापूर जिल्ह्यात 2 वर्षात 1350 जणांचा अपघाती मृत्यू! दुपारी 4 ते रात्री 12 या वेळेत सर्वाधिक अपघात; ‘या’ 5 महिन्यात अपघाताचे प्रमाण जास्त

लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत! महापालिकेत लाडक्या बहिणींचे मतदान आपल्यालाच मिळावे म्हणून भावी नगरसेवकांकडून मोफत ‘ई-केवायसी’ शिबिरे

SCROLL FOR NEXT