Satara Latest Marathi News 
सातारा

कोरोनाचा उद्रेक! गावोगावच्या ग्रामसुरक्षा समित्या झाल्या निष्क्रीय; प्रशासनाच्या पुढाकाराची गरज

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाला गावपातळीवर नियंत्रणात ठेवण्याच्या उपाययोजना करून आवश्‍यक कार्यवाही करण्यासाठी ग्रामसुरक्षा समित्यांची स्थापना केली आहे. मात्र, या समित्याच काही गावांचा अपवाद वगळता बहुतांश गावात निष्क्रीय असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. त्यामुळे गावागावांतील कोरोनासंदर्भातील उपाययोजना आवश्‍यक त्या प्रमाणात राबवल्या जात नाहीत. भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेत पुन्हा एकदा या समित्या ऍक्‍टिव्ह करण्याची गरज आहे. 

शासनाने दिलेल्या आदेशाचे आणि सूचनांचे काटेकोर पालन करत गावात कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यासाठी गावपातळीवर ग्रामसुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सरपंच हे या समितीचे अध्यक्ष आणि त्यामध्ये पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व गावातील काही जणांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कोरोना काळात या समित्यांनी आवश्‍यक त्या उपाययोजना करून चांगली कामगिरी केली. त्याची दखल घेत समित्यांना शासनाने दंड करण्याचे, पोलिसी कारवाया करण्याचेही अधिकार दिले. त्यातून अनेकांवर दंड, पोलिसी कारवाईही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे समितीची चांगलीच जरब गावोगावी होती. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे समित्यांना मरगळ आली. त्यातच मध्यंतरी जिल्ह्यातील निम्म्यावर गावात निवडणुकीचे वातावरण होते. त्यामुळे त्यामध्येही सत्ताबदल झाल्याने गावकारभारी बदलले. 

अशातच गेल्या महिन्यापासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. दररोज झपाट्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शासनाने नवीन नियमावली लागू केली आहे. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र कोरोना वाढत असतानाही समित्या निष्क्रीय असल्याचे जिल्ह्यातील गावागावांत चित्र आहे. त्यामुळे बाहेर गावावरून, बाहेरच्या राज्यातून, परदेशातून येणाऱ्यांवर म्हणावा तेवढा वॉच ठेवला जात नाही. आरोग्य विभाग, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका काम करत असल्याने दक्षता समित्यांचे कारभारी निवांत आहेत. मात्र, त्या समितीतील पदाधिकारी आणि सदस्यांनाही वाढणारा धोका ओळखून आता अंगावरील झूल टाकून कार्यरत राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

नवीन कारभाऱ्यांच्या पुढाकाराची गरज 

सातारा जिल्ह्यातील नऊशेवर गावांतील नवीन सरपंच निवडी मध्यंतरी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे गावाच्या कारभाराची सूत्रे गेली आहेत. गावचे सरपंच ग्रामसुरक्षा समितीचे अध्यक्ष असतात. त्यामुळे आता नवीन कारभाऱ्यांनीच गावाच्या सुरक्षितेतसाठी कोरोनाला गावच्या वेशीबाहेर रोखण्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामसुरक्षा समित्या ऍक्‍टिव्ह करण्याची गरज आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT