Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

यंदा खंडोबाच्या पालीत घुमणार नाही 'येळकोट येळकोट'चा नारा!

संतोष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल (ता. कऱ्हाड) येथील सोमवारी (ता. 25) होणारी श्री खंडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. मात्र, यात्रेतील धार्मिक विधी, पूजाअर्चा, रूढी, परंपरेनुसार करण्यात येणार असून, सासनकाठ्या, पालख्या, बैलगाड्यांना या कालावधीत पाल व परिसरात येण्यास बंदी करण्यात आली आहे. कऱ्हाडच्या प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार यात्रा रद्द करण्यात आली आहे. 

पालची श्री खंडोबा देवाची यात्रा 23 ते 29 जानेवारी कालावधीत तिथीप्रमाणे आयोजित करण्यात येणार होती. यात्रेचा मुख्य दिवस 25 रोजी होता. यात्रेसाठी महाराष्ट्रातून, तसेच विविध राज्यांतून, जिल्ह्यातून सुमारे पाच ते सहा लाख भाविक देवदर्शनासाठी येतात. यामुळे यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही, त्यामुळे यंदा पाल यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत फक्त श्री खंडोबा देवाची पूजाअर्चा, धार्मिक विधी केले जाणार असून, धार्मिक विधी झाल्यानंतर श्री खंडोबा मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. 23 जानेवारी ते 29 जानेवारी यात्रा कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे दुकाने, स्टॉलना परिसरात मनाई करण्यात आलेली आहे. सासनकाठ्या, पालख्या, बैलगाड्यांना पाल व परिसरात येण्यास बंदी करण्यात आली आहे. यात्रा कालावधीनंतर 31 जानेवारी रोजी पाकळणीच्या दिवशीसुद्धा धार्मिक विधीनंतर श्री खंडोबा मंदिर बंद ठेवण्याबाबत आदेश प्रशासनाने पारीत केलेले आहेत. 

यात्रा कालावधीत ट्रस्टी, पुजारी, पाल गावातील मानकरी वगळून इतर व्यक्तींना दर्शनासाठी बंदी करण्यात आली आहे. धार्मिक विधी ठिकाण सोडून मंदिर परिसरात पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी व ट्रस्टचे सदस्य, तसेच पाल गावातील मानकऱ्यांनीच पार पाडण्याचे असून, त्यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तींना सदर कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच यात्रा कालावधीत ट्रस्टी, पुजारी, पाल गावातील मानकरी वगळून इतर व्यक्तींना दर्शनासाठी बंदी करण्यात आली आहे. 

दहा किलोमीटर परिसर गर्दी करण्यास मनाई

 तसेच 22 ते 31 जानेवारीपर्यंत दहा किलोमीटर परिसर गर्दी करण्यास मनाई आदेश प्रांताधिकारी कऱ्हाड यांनी पारित केले आहेत. भाविकांनी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर यात्रा कालावधीत पाल गावी, मंदिर परिसरात येऊ नये व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन कऱ्हाडचे पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील व उंब्रज पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT