सातारा

साताऱ्यात रिक्षाचालकांची मनमानी भाडेवसुली; रात्री बारानंतरही दीडपट भाडेवाढ

प्रवीण जाधव

सातारा : उपप्रादेशिक परिवहन विभागाने अपेक्षित दरवाढ देऊनही रिक्षाचालकांची मनमानी पद्धतीने भाडेवसुली सुरूच आहे. त्यात कोरोना संसर्गामुळे आलेल्या निर्बंधांचा गैरफायदा घेत नियमानुसार रात्री बारानंतर आकारली जाणारी दीडपट भाडेवाढ काही जणांनी रात्री नऊनंतरच आकारण्यास सुरवात करून स्वत:चाच कायदा साताऱ्यात लागू केला आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. 

बहुतांश कायदे व नियम कागदावरच राहतात, याची प्रचिती साताऱ्यात रिक्षाभाडे नियमनाच्या निमित्ताने वारंवार येत आहे. शहरात जायचे असो किंवा उपनगरात साताऱ्यातील नागरिकांकडून रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडेवसुली करत असतात. पूर्वी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दुर्लक्षाने टेरिफचे दर ठरविले नाहीत, अशी ओरड असायची. हे कारण पुढे करत बिनधास्त भरमसाट भाडेवसुली सुरू होती. 'सकाळ'ने या विरोधात भूमिका घेत अनेकदा स्टिंग ऑपरेशन केले. त्यानंतर काही काळ भाडे आकारणी सुरळीत चालायची. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईचा बडगा उभारला जात होता. परंतु, आता पुन्हा सर्वकाही थंडावले आहे. तक्रार आली नाही, असे कारण सांगत उपप्रादेशिक परिवहन विभाग आपल्या जबाबदारीतून अंग झटकण्याचा प्रयत्न करत आहे. 

सध्या रिक्षाचालकांच्या मागणीनुसार टेरिफचे दर ठरविण्यात आलेले आहेत. त्यानुसार पहिल्या किलोमीटरसाठी 20 रुपये एवढा दर देण्यात आला आहे. त्याचबरोबर भाड्याचा टप्पाही दीड किलोमीटरवरून एक किलोमीटरवर आणण्यात आला आहे. तरीही काही रिक्षाचालकांकडून मनमानी पद्धतीने भाडेवसुली केली जात आहे. त्यातच कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या निर्बंधांचाही काहींनी गैरफायदा घेण्यास सुरवात केली आहे. नियमानुसार रिक्षाचालकांना रात्री बारानंतर दीडपट भाडे आकारणी करण्यास परवानगी आहे. परंतु, हा नियम आता काही महाभागांनी नऊवरच आणून ठेवला आहे. त्यामुळे बस स्थानकापासून गोडोली किंवा अन्य उपनगरापर्यंत जायलाही 100 पेक्षा जास्त भाडे सांगितले जात आहे. थोड्या लांब घर असेल तर दीडशेच्या खाली कोणी यायला तयार होत नाही. त्यातून प्रवासी व रिक्षाचालकांची वादावादी होत आहे. प्रवाशांची अशी लूट सुरू असताना प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर नागरिकांच्या हक्काची भाषा करणाऱ्या संघटनाही याबाबतीत मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे सातारकरांना कोणी वाली आहे का, असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. नागरिकांच्या होणाऱ्या या खुलेआम लुटीबद्दल उपप्रादेशिक परिवहन विभाग व रिक्षा संघटनांनी ठोस भूमिका घेणे आवश्‍यक आहे. तसेच प्रवाशांनीही तक्रारीसाठी पुढे येणे आवश्‍यक आहे. 

...या कारणांसाठी करू शकता तक्रार 

  • -जादा प्रवासी वाहतूक 
  • मीटरचा वेग जास्त असणे 
  • स्त्री प्रवाशांशी उद्धट वर्तन 
  • प्रवासाला नकार दिला 
  • अर्वाच्य शब्द वापरले 
  • बिल्ला न लावता वाहन चालवणे 
  • मीटरपेक्षा जास्त भाडे घेणे 
  • मीटर बंद असणे किंवा नसणे 
  • दूरच्या मार्गाने इच्छितस्थळी जाणे 
  • सामानासाठी जादा भाडे आकारणे 
  • दारूच्या नशेत वाहन चालविणे 
  • बनावट दरपत्रक बाळगणे 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT