man 
सातारा

संवेदशील गाव; पण कोरोना संकटात दाखवली एकी

रुपेश कदम

दहिवडी : राजकीयदृष्ट्या संवेदनशील व माण तालुक्‍याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरात एक गाव, एक गणपतीचा नारा घुमला. 

सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांची गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बैठक बोलावली होती. या बैठकीस नगराध्यक्ष सतीश जाधव, माजी सभापती अतुल जाधव, युवा नेते सिध्दार्थ गुंडगे आदी उपस्थित होते. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता गणेशोत्सव साधेपणाने व शांततेत साजरा करण्याचे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले. यावेळी सर्व गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्त्यांनी सकारात्मक मते मांडली. गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करून आपल्याच नागरिकांचे आरोग्य व जीव धोक्‍यात घालणे योग्य नाही, असे सर्वांचे मत आले. सर्वच मंडळांनी पुढाकार घेऊन सर्वानुमते शहरातील सिद्धीविनायक मंदिरात गणेशाची स्थापना करून एक गाव, एक गणपती उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पोलिस प्रशासन व नागरिकांनी स्वागत केले. 

या बैठकीस नगरसेवक समीर योगे, नगरसेवक प्रशांत शिंदे, विकास जाधव, संदीप महाडिक, तेजस पवार, निखिल शिंदे, ऍड. मिनेश पाटील, अभिजित चव्हाण आदींसह शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT