कऱ्हाड : कोरोनामुळे शाळा केव्हा सुरू होणार, याबाबत अनिश्चितता असली तरी जिल्ह्यात 2020-21 च्या शैक्षणिक वर्षास शासनस्तरावर गती आली आहे. त्यासाठी तालुकानिहाय मागणी केलेली पाठ्यपुस्तके दाखल होऊ लागली आहेत. जिल्ह्यात यंदा दोन लाख 65 हजार 30 पुस्तकांचे संचाची मागणी आहे. त्यातील सातारा, फलटण, माण, कऱ्हाड, वाई तालुक्यांत पाठ्यपुस्तके दाखलही झाली आहेत.
जिल्ह्यात दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाठ्यपुस्तके दाखल होतात. जिल्हास्तरावर आलेली पुस्तके तालुकास्तरावर पाठवली जातात. मात्र, सध्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी थेट ऑनलाइन पाठ्यपुस्तकाची मागणी द्यायची असून, पुस्तकेही थेट तालुक्याला मिळत आहेत. कोल्हापूर येथूल पुस्तकांचे संच येत आहेत. त्यानुसार संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पुस्तकांची ऑनलाइन मागणी केली होती. त्यानुसार यंदा जिल्ह्यात साताऱ्यासाठी 40 हजार 877, जावळी तालुक्यासाठी आठ हजार 210, महाबळेश्वरसाठी चार हजार 857, वाईसाठी 16 हजार 618, खंडाळा तालुक्यासाठी 14 हजार 255, फलटणसाठी 34 हजार 729, माणसाठी 23 हजार 827, खटाव तालुक्यासाठी 25 हजार 911, कोरेगावसाठी 22 हजार 265, कऱ्हाडसाठी 50 हजार 123, पाटणसाठी 23 हजार 358 पुस्तकांचे संच मिळणार आहेत. सध्या पुस्तके तालुकानिहाय मिळू लागली आहेत. आजअखेर सातारा, फलटण, माण, वाई व कऱ्हाड तालुक्यांत पुस्तके दाखल झाली असून, ती उतरवून घेण्यात आली आहेत. उर्वरित तालुक्यांतही येत्या दोन दिवसांत पुस्तके येणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले. मात्र, कोरोनाचा धोका असल्याने यंदा शाळा केव्हा सुरू होणार, याबाबत अनिश्चितता असली तरी शासनाने पाठ्यपुस्तके वेळेत दाखल केली आहेत. त्यामुळे ती विद्यार्थ्यांपर्यत कशी पोचवली जाणार, याबाबत उत्सुकता आहे. मात्र, अद्याप शासनाने पुस्तक संचाच्या वितणाबाबत कोणतेही निर्देश नसल्याने शिक्षण विभागाला त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
कोरेगाव तालुक्याला एकात्मिक पुस्तक
राज्याच्या शिक्षण विभागाने यंदापासून दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी एकात्मिक पुस्तकाचा उपक्रम हाती घेत आहे. त्यासाठी शासनाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्याची निवड केली आहे. त्यानुसार राज्यात 36 तालुके निवडले असून जिल्ह्यातून कोरेगाव तालुक्याची निवड झाली आहे. त्यामुळे कोरेगाव तालुक्यासाठी यंदा येणाऱ्या 22 हजार 265 पुस्तकांच्या संच हा एकात्मिक पुस्तकांचा असेल.
जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी दोन लाख 65 हजार 30 पुस्तकांचा संच येणार आहेत. त्यानुसार तालुकानिहाय पुस्तकेही दाखल झाली असून, दोन दिवसांत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पुस्तके येतील. त्यानंतर पुस्तक संच विद्यार्थ्यापर्यंत कसे वितरित करायचे, याबाबत निर्देश आल्यावर पुढील कार्यवाही होईल.
-प्रभावती कोळेकर,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), सातारा
तेव्हांपासूनच भारताची अर्थव्यवस्था घसरत होती : पृथ्वीराज चव्हाण
कुणी रानमेवा घेता का रानमेवा...
जळीत कुटुंबाच्या मदतीला धावले हात
हा मंत्री 47 दिवस लढताेय रस्त्यावर!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.