Satara 
सातारा

पहिल्या प्रयत्नातील चुका सुधारून "त्याने' रोवला "यूपीएससी'त झेंडा

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : स्वतःमधील जिद्द, जिज्ञासा व चिकाटी या त्रिसूत्रीचा आधार घेत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात अवघ्या एकापेक्षा कमी गुणाने यश हुकले. दुसऱ्या प्रयत्नावेळी अभ्यासातील पूर्वीच्या चुका सुधारत यश खेचून आणण्याचा निर्धार केला आणि मला यूपीएससी परीक्षेत यश मिळाले. मनात जिद्द पक्की असेल, तर कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळते, असा विश्वास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये 481 व्या क्रमांकाने यश मिळणाऱ्या काले (ता. कऱ्हाड) येथील ऋषिकेश जयसिंग देसाई याने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 

ऋषिकेशच्या वडिलांचे काले येथे कापड दुकान आहे, तर आई सुरेखा या गृहिणी आहेत. काले येथे देसाई बंधूंचे 12 सदस्यांचे एकत्र कुटुंब आहे. ऋषिकेशचे वडील व आई घरातील मुलांच्या शिक्षणासाठी 25 वर्षांपासून कऱ्हाडजवळील कोयना वसाहतीत स्थायिक आहेत. ऋषिकेशची बहीण व भावंडे पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ऋषिकेशचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण कऱ्हाडच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्समधून पूर्ण केल्यानंतर त्याने पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओइपी) येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याआधी त्याच्या मनात स्पर्धा परीक्षेचे आकर्षण होते. पदवी करत असताना स्पर्धा परीक्षेतील रस अधिकच वाढला. पदवीच्या शेवटच्या वर्षात कॅम्पस प्लेसमेंटसाठी न बसता स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. 2017 मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण झाले. 2018 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात अवघ्या एकापेक्षाही कमी गुणाने यश हुकले. 

दुसऱ्या प्रयत्नावेळी पूर्व, मुख्य व मुलाखत या तिन्ही पातळ्यांवर यश मिळवायचेच, ही मनाशी खूणगाठ बांधून अभ्यास सुरू केला. त्यासाठी पूर्वीच्या अभ्यासातील चुका सुधारत वाढलेला अनुभव बरोबर घेऊन प्रयत्न केला. अखेर जिद्द, जिज्ञासा व चिकाटीमुळे हे यश मिळाले. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीच्या अभ्यासिकेत सकाळी नऊ ते रात्री 11 पर्यंत थांबून अभ्यास केला. यावेळेत जेवण व विश्रांतीसाठीचा वेळ वगळता उर्वरित वेळेत मन लावून अभ्यास केला. आई, वडील व कुटुंबातील सर्वांच्या प्रेरणेमुळे मला हे यश मिळाले, असेही त्याने सांगितले. 

ऋषिकेशला दहावीच्या परीक्षेत 97, तर बारावीच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळाले आहेत. बारावीच्या परीक्षेत तो जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल रिलायन्स फाउंडेशनने नीता अंबानी यांच्या हस्ते त्याचा गौरव करत शिष्यवृत्ती दिलेली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्याचा गौरव केला आहे. तबला, पोहणे व व्यायाम हे छंदही त्याने उत्तमपणे जोपासले आहेत. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel - Iran War मध्य आशियात युद्धाचा भडका! इस्रायलचा इराणवर हल्ला, देशात आणीबाणी लागू; एअरस्पेस बंद, सर्व शाळांना सुट्टी

चेंबूरमध्ये भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ८व्या मजल्यावरून कोसळले ६ मजूर

Mumbai Goa Highway Delay : कोकणवासीयांचा संताप! मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात दिरंगाई; बड्या ठेकेदारांना ठोठावला तब्बल 16 कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : चेंबूरमध्ये धक्कादायक घटना, इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडले 6 कामगार

PG Portal : सरकारी ऑफिसमध्ये फेऱ्या मारून वैतागलाय? घरबसल्या 'इथे' करा कोणत्याही विभागाची तक्रार; थेट पंतप्रधान कार्यालयात पोहोचेल तुमचं म्हणणं

SCROLL FOR NEXT