Sewage project Sakal
सातारा

सातारा जिल्ह्यात १,७३९ गावांत सांडपाणी प्रकल्प

जिल्ह्यातील १०५५ कामांना प्रशासकीय मंजुरी; ‘झेडपी’ने दिलाय भर

सकाळ वृत्तसेवा

सातारा - पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर भर दिला आहे. या प्रकल्पांसाठी जिल्ह्यात पाच कोटींहून अधिक निधी मंजूर झाला असून, एक हजार ५५ गावांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. पाच हजार लोकसंख्येच्या आतील गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार असून सद्य:स्थितीत २३४ गावांमध्ये प्रकल्पाचे काम सुरूही झाले आहे.

स्वच्छता अभियान, निर्मलग्राम, हागणदारीमुक्त अभियानामध्ये सातारा जिल्ह्याची देशात ओळख निर्माण झाली. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारचे अभियान, उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, गावच्या समग्र स्वच्छतेत अजूनही ग्रामीण भागांमध्ये काही समस्या पुढे आल्या आहेत. या प्रकारचे आव्हान पार करण्यासाठी जिल्हा परिषदेने पाच हजार लोकसंख्येच्या आतील एक हजार ७३९ गावांसाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. एप्रिल २०२२ अखेर जिल्ह्यात विविध तालुक्यांना चार कोटी ९३ लाख रुपयांचे अनुदान वितरित केले आहे.

जागतिक बँकेच्या सहकार्याने हे काम सुरू असून २३४ हून अधिक ग्रामपंचायतींनी प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. एक हजार ७८ गावांना तांत्रिक व एक हजार ५५ गावांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. ‘‘घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी सर्वच गावांनी पुढे येण्याची गरज आहे. पाणी व स्वच्छता विभागाकडून याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हावासीयांनी हे अभियान यशस्वी करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT