सातारा

शेंद्रे ते कागल महामार्गाच्या टोलवसुलीसाठी 53 दिवसांची मुदतवाढ

20 वर्षांपूर्वी एनएचआयशी झालेल्या करारानुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते कागल 133 किलोमीटर अंतराच्या या महामार्गाची उभारणी केली.

तानाजी पवार

20 वर्षांपूर्वी एनएचआयशी झालेल्या करारानुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते कागल 133 किलोमीटर अंतराच्या या महामार्गाची उभारणी केली.

वहागाव - राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) शेंद्रे (Shendre) ते कागल (Kagal) या महामार्गाचा राज्य रस्ते विकास महामंडळाचा रस्ते देखभालीचा व टोल वसुलीचा (Toll Recovery) कार्यकाल ता. २ मे संपणार होता, मात्र कोरोना काळात महामार्ग बंद राहिल्याने त्यादरम्यानची रस्ते देखभालीची जबाबदारी व टोल वसुली करण्यासाठी एनएचआयकडून (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडून) राज्य रस्ते विकास महामंडळाला 53 दिवसांची म्हणजे 25 जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे सध्या तरी सातारा जिल्ह्यातील तासवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील किणी या टोलवसुलीची व रस्ते देखभालीची जबाबदारी रस्ते विकास महामंडळाकडे असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बांधा, वापरा व हस्तांतर करा या हेतूने 20 वर्षांपूर्वी एनएचआयशी झालेल्या करारानुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते कागल 133 किलोमीटर अंतराच्या या महामार्गाची उभारणी केली. दरम्यान, आज ता. 2 मेला हा कार्यकाल संपणार होता,मात्र कोरोना काळात संपूर्ण देशात अचानक लाँकडाऊन जाहिर झाल्याने सुमारे 53 दिवस हा महामार्ग बंद होता. त्यावेळी शासननिर्णयानुसार येथील टोलवसुलीही बंद होती. त्यानंतर 53 दिवसानंतर टोलवसुली पूर्ववत सुरु झाली. मात्र, करारानुसार त्या 53 दिवसांची टोलवसुली होणे अपेक्षित होते. मात्र ती झाली नव्हती. त्यामुळे रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापनाने एनएचआयकडे टोलवसुलीसाठी मुदतवाढ मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. नुकताच एनएचआयकडून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या या प्रस्तावाला मुदतवाढ मिळाली असून येऊ घातलेल्या 53 दिवसांसाठी म्हणजेच 25 जूनपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते कागल या 133 किलोमीटरवरील महामार्गाच्या एनएच-4 च्या रस्ते देखभालीची व टोल वसुलीची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे असणार आहे. त्यामुळे सध्या तरी सातारा जिल्ह्यातील तासवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील किणी या टोलवसुलीची व रस्ते देखभालीची जबाबदारी रस्ते विकास महामंडळाकडे असणार आहे. दरम्यान, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर आज नेहमीप्रमाणे टोल वसुली सुरु होती.

टोल बंदची अफवाच...

राज्य रस्ते विकास महामंडळाचा रस्ते देखभालीचा व टोल वसुलीचा कार्यकाल आज ता. २ मे संपणार होता, मात्र कोरोना काळात महामार्ग बंद राहिल्याने त्यादरम्यानची रस्ते देखभालीची जबाबदारी व टोल वसुली करण्यासाठी एनएचआयकडून 53 दिवसांची म्हणजे 25 जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. टोल बंदबाबत कोणताही शासन आदेश अद्याप आलेला नाही. त्यामुळे, सध्या तरी सातारा जिल्ह्यातील तासवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील किणी या टोलवसुलीची व एनएच-4 च्या रस्ते देखभालीची जबाबदारी रस्ते विकास महामंडळाकडे असून टोल बंद होणार ही अफवा आहे. सोशल मीडियांवर होणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, संबंधित व्यवस्थापनास टोल वसुलीस सहकार्य करावे.

- वसंत पंढारकर (प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग,कोल्हापूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT