Police Ajaykumar Bansal esakal
सातारा

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार; पोलिस अधीक्षकांचे स्पष्ट संकेत

कोरोना नियंत्रणात येत नाही. त्यामुळे कडक लॉकडाउन करवा लागेल.

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (सातारा) : नियम न पाळणाऱ्यांवर यापुढील काळात कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी येथे सांगितले. येथील पोलिस ठाण्यात बाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बन्सल यांनी पोलिस ठाण्यास भेट देऊन कोरोनामुळे उद्‌भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला.

या वेळी पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी उपस्थित होते. बाधित कर्मचाऱ्यांची माहिती देताना कोंडुभैरी यांनी सांगितले, की येथील सर्वच कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. पोलिस ठाण्याची भेट झाल्यानंतर अजयकुमार बन्सल यांनी शहरातून फेरफटका मारून लॉकडाउनच्या नियमांचे नागरिक पालन करतात का, याची माहिती घेतली. त्यांनी पोलिस ठाणे ते सुभाष चौक असा फेरफटका मारला. या वेळी काही जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू होती.

तेथील दुकानदारांची बन्सल यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले. अधीक्षक बन्सल म्हणाले, "ब्रेक द चेनसाठी लॉकडाउन लागू केला, तरी कोरोना नियंत्रणात येत नाही. त्यामुळे कडक लॉकडाउन करवा लागेल. शहरात लॉकडाउनचे नियमांचे पालन चांगल्या प्रकारे केले जात आहे. पर्यटकांची आवकही मंदावली आहे; परंतु नागरिकांनी लस घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.''

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT