satara esakal
सातारा

सातारा : घरकुल लाभार्थ्यांपुढे पुन्हा निवाऱ्याचा प्रश्न

जिल्ह्यात २५ वर्षांपूर्वीची घरकुले झाली जीर्ण; नव्याने सर्व्हे करून पुन्हा घरे देण्याची गरज

हेमंत पवार

जिल्ह्यात २५ वर्षांपूर्वीची घरकुले झाली जीर्ण; नव्याने सर्व्हे करून पुन्हा घरे देण्याची गरज

कऱ्हाड : ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, ज्यांना राहण्यासाठी कुडामेडाची घरे आहेत, त्यांच्यासाठी केंद्र व राज्य शासनाने घरकुल योजना (Housing plan)सुरू केली. त्यामार्फत जिल्ह्यातील हजारो कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, अनेक लाभार्थींनी लाभ घेऊन २० ते २५ वर्षांचा काल उलटला आहे. त्यामुळे ती घरे आता जीर्ण होऊन राहण्यायोग्य राहिलेली नाहीत. त्यांच्यापुढे निवाऱ्याचा मोठा प्रश्न उभा आहे. त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने(satara district administration) पुन्हा सर्व्हे करून त्यांना निवारा देण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.

केंद्र व राज्य शासनाने ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, जे लोक घरे बांधू शकत नाही, त्यांच्यासाठी अनुदान देऊन घरे बांधण्यासाठी घरकुल योजनेतून लाभ दिला. कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित लाभार्थींना इंदिरा आवास, रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना आदी योजनांतून घरकुलांचा लाभ देण्यात आला. त्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निकाली निघाला होता. त्यामुळे त्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला होता. त्यांना घरकुले मिळून सुमारे २५ वर्षांचा कालावधी उलटला आहे.

त्यावेळचे बांधकाम जीर्ण झाले आहे. त्यामुळे ती घरकुले राहण्यायोग्य राहिलेली नाहीत. अनेक ठिकाणी भिंतींना चिरा गेल्या आहेत, काही ठिकाणी त्या घरांची पडझड झाली आहे. अशा धोकादायक स्थितीत पर्यायच नसल्याने लाभार्थ्यांना राहावे लागत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अनेक घरकुलांच्या लाभार्थ्यांनी संबंधित गावातील ग्रामपंचायतींना अशा धोकादायक घरकुलांची माहिती दिली आहे. त्या ग्रामपंचायतींनी वरिष्ठ स्तरावर कळवले आहे. मात्र, त्याची पुढे काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे त्या लाभार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्याचा विचार करून प्रशासनाने आता अशा घरकुलांतील कुटुंबांचा पुन्हा सर्व्हे करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकारी, सीईओंनी घ्यावा निर्णय

सातारा जिल्ह्यातील २५ वर्षांपूर्वीच्या घरकुलांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक घरकुले राहण्यायोग्य राहिली नसल्याने लाभार्थ्यांनी भाड्याच्या घरात आसरा घेतला आहे. त्यातच त्यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांना घरे बांधता येत नाहीत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची मोठी गैरसोय सुरू आहे. त्याचा विचार करून जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनीच त्यासाठी पुढाकार घेऊन अशा घरकुलांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

शासनाने आवास योजनेतून २० ते २५ वर्षांपूर्वी लाभार्थ्यांना घरकुले दिली. त्यातून त्यांना निवारा मिळाला. सध्या मात्र त्या घरकुलांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी ती राहण्यायोग्य राहिलेली नाहीत. त्याचा विचार करून शासनाने जिल्ह्यातील अशा घरकुलांचा सर्व्हे करून त्यांना नव्याने घरकुले द्यावीत.

-नामदेव पाटील,

सदस्य, कऱ्हाड पंचायत समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT