सातारा

सैदापुरातील सासवे कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू; अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज

हेमंत पवार

क-हाड : सैदापुर (ता कराड) येथे एकाच कुटुंबातील सख्या तीन बहिणींचा अकाली मृत्यू झाला आहे. कुटंबियासमवेत एकत्रित जेवण झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा संबधीत तीन मुलींसह आईला उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. यातील तीन मुलींना जास्त त्रास झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या तिन्ही मुलींना कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तिन्ही मुलींच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सासवे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

आयुषी शिवानंद सासवे (वय तीन), आस्था शिवानंद सासवे (वय नऊ), आरुषी शिवानंद सासवे (वय आठ) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे कुटुंब सैदापुर येथील मिल्ट्री होस्टेल नजीक वास्तव्यास आहे.

काबाडकष्टाने पिकवलेल्या पपईला मिळतोय कवडीमोलाचा भाव; सातारा जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः रडकुंडीला

दरम्यान मृत्यू झालेल्या मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तो पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. अन्नातून विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT