Pingali lakes esakal
सातारा

चिंताजनक! माणदेशातील तलावांत केवळ दहा टक्के पाणीसाठा

फिरोज तांबोळी

गोंदवले (सातारा) : गेल्या दोन वर्षांत समाधानकारक पाऊस (Heavy Rain) झाल्याने माणमधील राणंद, आंधळी व पिंगळी तलावात (Ranand, Andhali and Pingali lakes) सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात लोधवडे, गंगोती, मासाळवाडी व महाबळेश्वरवाडी या तलावांत ठणठणाट आहे. इतर तलावांतदेखील केवळ दहा टक्के पाणीसाठा उरला आहे. हवामानाच्या अंदाजानुसार (Meteorological Department) यंदाही पुरेसा पाऊस होऊन सर्व पाणीसाठे 'फुल्ल' होण्याची आशा माणवासीयांमधून व्यक्त होत आहे. (Water Shortage In Lodhwade Gangoti Masalwadi And Mahabaleshwarwadi Villages Satara Marathi News)

माण तालुक्यात पावसाच्या लहरीपणाचा फटका बसून लोकांना दुष्काळाला सामोरे जावे लागते. पाण्यासाठी टँकर, तर जनावरांसाठी छावणीचा आधार घ्यावा लागतो.

माण तालुक्यात पावसाच्या लहरीपणाचा फटका बसून लोकांना दुष्काळाला सामोरे जावे लागते. पाण्यासाठी टँकर, तर जनावरांसाठी छावणीचा आधार घ्यावा लागतो. गेल्या दोन वर्षांत मात्र पुरेशा पावसाला जलसंधारणाची साथ मिळाल्याने ही परिस्थिती बदलून गेली. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वत्र पाणीसाठे ‘ओव्हरफ्लो’ झाले. त्यामुळे यंदाही दुष्काळाच्या धगीपासून लोकांची सुटका झाली. यंदा काही भागाला अवकाळी तर सर्वत्र झालेल्या वळिवाच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे नुकसानीचा फटकाही सोसावा लागला. गावोगावी झालेल्या जलसंधारण कामामुळे पावसाचे पाणी त्या त्या भागात थांबून राहिल्याने अद्याप मोठ्या जलसाठ्यांपर्यंत म्हणावे इतके पाणी पोचले नाही. त्यामुळे या तलावांतील पाणीपातळी घटत गेली.

सध्या सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असला तरी तालुक्यातील लोधवडे, गंगोती, मासाळवाडी व महाबळेश्वरवाडी तलाव अजूनही कोरडेच आहेत. तर जांभूळणी, जाशी व ढाकणी तलावांत दहा टक्क्यांहून कमी पाणीसाठा उरला आहे. आंधळीसह पिंगळी व राणंद तलावात मात्र पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या तुलनेत पिंगळी तलावात सर्वाधिक म्हणजे ५२ टक्के पाणीसाठा आहे, तर आंधळीत ३७.५५ व राणंदमध्ये २५ टक्के वापरयुक्त पाणीसाठा उरला आहे. यंदाही पावसाचा जोर कायम राहिल्यास सर्व तलाव लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे. शिवाय माण नदीदेखील भरून वाहण्याची आशा व्यक्त होत आहे.

दहा तलावांत ३५.३५ दशलक्ष घनमीटर पाणी

तालुक्यातील दहा तलावांची एकूण पाणीसाठवण क्षमता ३५.३५ दशलक्ष घनमीटर असून, एकूण उपयुक्त पाणीसाठा २९.८७ दशलक्ष घनमीटर आहे. त्यापैकी ६.४२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.

पाणीसाठ्याची सद्य:स्थिती

(कंसात एकूण उपयुक्त पाणीसाठा, सर्व साठे दशलक्ष घनमीटरमध्ये)

  • राणंद- (६.४२) ---१.६१, पिंगळी- (२.३६)----१.२३

  • आंधळी- (७.४३)----२.७९, लोधवडे -(०.७०)----०

  • जांभूळणी- (२.२६)-----०.१७, गंगोती- (१.३६)----०

  • महाबळेश्वरवाडी- (१.५०)-----०, ढाकणी- (२.६६)---०.३०

  • मासाळवाडी- (२.०२)-----०, जाशी- (३.१६)------०.३२

Water Shortage In Lodhwade Gangoti Masalwadi And Mahabaleshwarwadi Villages Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT