सातारा

दलालांपासून वाचण्यासाठी मार्केटला माल नेणे गरजेचे : तानाजी चौधरी

विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : दुष्काळी परिस्थितीवर मात करत शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतीतून चांगले उत्पादन काढतो. मात्र, त्या मालाची विक्री करताना दलालांकडून त्यांची फसवणूक होताना दिसून येते. यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला माल थेट मार्केटला आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन के. डी. चौधरी उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी 
संचालक तानाजी चौधरी यांनी केले. 

मोही (ता. माण) येथे के. डी. चौधरी उद्योग समूह पुणे व शेतकरी सचिन देवकर यांच्या संयुक्त विद्यमाने माण तालुक्‍यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी डाळिंब व सीताफळाचे चांगल्या दर्जाचे उत्पादन व विक्री व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्र पार पडले. त्या वेळी श्री. चौधरी बोलत होते. शेतीतज्ज्ञ भालचंद्र पोळ यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन कसे काढायचे, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांच्या वतीने श्री. चौधरी यांचे विशाल गुंजवटे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी मंगेश चौधरी, रामचंद्र शिंदे, सुधीर मोरे, दिलीप पिसाळ, बबनराव देवकर, बापूराव देवकर, विठ्ठल डुबल, रामहरी चव्हाण, हरिदास चव्हाण, राजेंद्र देवकर, बाळासाहेब जगदाळे, अशोक भोसले, अक्षय मगर, सस्ते, शिवाजीराव पोळ, हणमंतराव भोसले, गणेश शिंदे, संतोष भोसले आदी शेतकरी उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांनी डाळिंबविषयक विविध प्रश्न मांडले. त्यावर तज्ज्ञांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT