OBC Reservation esakal
सातारा

'आरक्षणाचा मुद्दा न सोडविल्यास ठाकरे सरकारला किंमत मोजावी लागेल'

प्रशांत घाडगे

सातारा : ओबीसी समाजाचे (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पुन्हा मिळवून देण्याची इच्छा नसल्यामुळेच सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे सरकारने (Thackeray Government) केवळ बघ्याची भूमिका घेतली. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवण्याचा ठाकरे सरकारचा डाव असल्याचा आरोप भाजपचे ओबीसी मोर्चा (BJP OBC Morcha) प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांनी पत्रकाद्वारे केला.

आरक्षणाबाबत न्यायालयात सक्षमपणे बाजू न मांडता ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली.

या अगोदर आरक्षणाबाबत न्यायालयात सक्षमपणे बाजू न मांडता ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आणि आता तोच पाढा पुन्हा गिरविण्याचा ठाकरे सरकारचा डाव असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत ओबीसी समाजाला चुचकारण्यासाठी तातडीच्या बैठकीचे नाटक ठाकरे सरकारने केले. पण, या बैठकीत सरकारने कोणताही प्रस्ताव न ठेवता केवळ विरोधकांची मते जाणून घेतली. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्थापित न होण्यासाठी ठाकरे सरकार निर्णयात टाळाटाळ करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणासंदर्भात पाच समित्या स्थापन करून मागासलेपणासंबंधीचा अहवाल तयार करण्यात आला होता. त्याच धर्तीवर ओबीसी आरक्षणासंबंधात इंपिरिकल डेटा तयार करणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाविकास आघाडीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा अधिक अस्थिर केला. निवडणुकांअगोदर आरक्षणाचा मुद्दा सकारात्मकरित्या न सोडविल्यास त्याची किंमत ठाकरे सरकारला मोजावी लागेल, असा इशाराही श्री. टिळेकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT