5G spectrum
5G spectrum google
विज्ञान-तंत्र

5G येणार... पण तुम्हाला काय फायदा होणार ? कधी सुरू होतेय सुविधा

नमिता धुरी

मुंबई : केंद्र सरकारने देशात 5G spectrum ला परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच देशात 5G सेवा सुरू होणार आहे. यामुळे वापरकर्त्यांना नक्की काय फायदा होईल हे जाणून घेऊ या....

5G म्हणजे काय ?

5G म्हणजे फिफ्थ जनरेशन ऑफ मोबाईल नेटवर्क. यामुळे नेटचा वेग वाढेल. विना अडथळा एचडी व्हिडिओ सर्फिंग करता येईल. 5G म्हणजे 4Gची पुढील आवृत्ती आहे. यामुळे ग्राहकांना क्लाऊडशी थेट कनेक्ट होता येईल.

फायदा काय ?

१. 4Gपेक्षा दहापट जास्त वेगवान इंटरनेट मिळेल.

२. व्हॉट्सअॅप आणि गुगल ड्युओ यांच्या माध्यमातून विनाअडथळा व्हिडिओ कॉल्स करता येतील.

३. युट्यूब आणि ओटीटीवर विनाअडथळा व्हिडिओ कन्टेन्ट पाहाता येतील.

४. दोन जीबीचा सिनेमा १० ते २० सेकंदांत डाऊनलोड होईल.

५. विनाचालक मेट्रो आणि इतर वाहनांचे संचालन सोपे होईल.

६. आरोग्य, हॉटेल, हॉस्पिटॅलिटी, विज्ञान या क्षेत्रांत रोबोचा वापर करणे सोपे होईल.

७. कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर सुलभ होईल.

८. आभासी जगाचा विनाअडथळा अनुभव घेता येईल.

केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या माहितीनुसार, ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव पुढील २० वर्षांसाठी केला जाईल. लिलावामध्ये जिंकणारी कंपनी ५ जी सेवा देईल. सेवा सुरू होण्याची तारीख अजून निश्चित झालेली नाही. पण ६ महिने ते १ वर्षाच्या कालावधीमध्ये ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

यासाठी विविध दूरसंचार कंपन्यांनी तयारी सुरू केली आहे. एअरटेलने ५ जीची चाचणीही पूर्ण केली आहे. दुसऱ्या बाजूला जिओनेही ५जी सेवा देण्याचा दावा केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT