Indian population originated in three migration waves: study
Indian population originated in three migration waves: study 
विज्ञान-तंत्र

भारतीयांचे मूळ आफ्रिका, इराणमध्ये 

पीटीआय

लंडन : गेल्या पन्नास हजार वर्षांमध्ये आफ्रिका, इराण आणि मध्य आशियातून विविध तीन टप्प्यांमध्ये आलेल्या स्थलांतरितांच्या लाटा हे भारतीय लोकसंख्येचा स्रोत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. भारतीय उपखंडामधील विविध व्यक्तींच्या जनुकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

भारतीय उपखंडामध्ये विशेषत: भारतामध्ये प्रचंड विविधता आहे. येथे अनेक भाषा, संस्कृती आणि धर्म हजारो वर्षांपासून एकत्र नांदत आहेत. याबाबत ब्रिटनमधील हडर्सफिल्ड विद्यापीठातील तज्ज्ञांनी अभ्यास केला. त्यांच्या निष्कर्षानुसार, दक्षिण आशियातील काही जनुकांचा इतिहास फार प्राचीन आहे. भारतात साधारणपणे पन्नास हजार वर्षांपूर्वी आलेले लोक हे मूळ आफ्रिकेतील भटके शिकारी होते. त्यानंतर साधारण वीस हजार वर्षांपूर्वी आलेल्या हिमयुगानंतर इराणमधून स्थलांतरितांची लाट भारतात आली. याच लोकांनी भारतात शेतीचा प्रसार केला. जनुकांमधील स्त्रीनिर्मितीसाठी आवश्‍यक असलेल्या गुणसूत्रांचा (वाय) अभ्यास केला असता त्यामध्ये हे वैशिष्ट्य दिसून येते. मागील पाच हजार वर्षांमध्ये भारतात स्थलांतरितांची तिसरी लाट मध्य आशियातून आली, असे संशोधक गटाच्या सहप्रमुख मरिना सिल्वा यांनी सांगितले. 

संस्कृत-ग्रीक संबंध 
ताम्र युगात कॉकेशस प्रांतातून प्रथमच काही लोक स्थलांतरित होऊन भारतात आले. पुरुषसत्ताक संस्कृती असलेल्या या भटक्‍या लोकांनी घोड्याला माणसाळले होते आणि त्यांच्याच भाषेत नंतर थोडा बदल होऊन संस्कृतची निर्मिती झाली. संस्कृतचे प्राचीन ग्रीक आणि लॅटिन भाषेशी अनेक प्रकारे साम्य असल्याचेही दिसून आल्याचे सिल्वा यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT