mobile tariff hike your mobile bills may increase in 2023 check details marathi
mobile tariff hike your mobile bills may increase in 2023 check details marathi  Sakal
विज्ञान-तंत्र

Mobile Tariff Hike : नवीन वर्षात मोबाईलवरील खर्च वाढणार? काय आहे यामागचं कारण, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनच्या जगात अनेक बदल झाले आहेत. बाजारात नवीन फोन आल्याने दूरसंचार कंपन्यांनीही दर वर्षी त्यांचे टॅरिफ प्लॅन बदलले आहेत. जिथे आम्ही महिन्याला फक्त 1GB वापरण्यासाठी 200 रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यायचो, आता आपल्याला 200 रुपयांपेक्षा कमी दरात डेली 1GB डेटा मिळतो.

पण सध्या 5G लाँच झाल्यामुळे आता अनेक मोठे बदल होऊ शकतात. टेलिकॉम कंपन्या या वर्षी मोबाईल टॅरिफ वाढवू शकतात. याची अनेक कारणे आहेत आणि आज आपण ही कारणे पाहणार आहोत जेव्हा किमती वाढू शकतात. त्याबद्दल जाणून घेऊया.

मोबाईल टॅरिफ का वाढू शकतात?

मोबाइल कंपन्या 2023 च्या मध्यापर्यंत म्हणजे जून, जुलैपर्यंत दर वाढवू शकतात. ब्रोकरेज फर्म IIFL सिक्युरिटीजच्या अहवालात असे दिसून आले आहे की 5G संबंधित ARPU (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) नजीकच्या भविष्यात कमी होण्याची शक्यता आहे, 4G प्रीपेड टॅरिफ वाढ ही कंपन्यांसाठ सर्वात महत्त्वाची ARPU लीव्हर राहिली आहे. म्हणून 2023 च्या मध्यात 4G प्रीपेड टॅरिफ वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

प्रीपेड आणि पोस्टपेड दर वाढले आहेत

टेलिकॉम कंपन्या प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्लॅनच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. तज्ञांचा असा दावा आहे की पोस्टपेड वापरकर्त्यांना देखील प्लॅन दरांमध्ये काही प्रमाणात वाढ दिसू शकते, कारण कंपन्यांचे पोस्टपेड रिव्हेन्यू योगदान कमी होत चालले आहे.

नोव्हेंबर 2021 मध्ये झाली होती दरवाढ

भारतात शेवटची मोबाइल प्रीपेड टॅरिफ वाढ नोव्हेंबर 2021 मध्ये जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर व्होडाफोन आयडियाने मोबाईल सेवा दर 42 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले होते. याशिवाय भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओनेही दर वाढवले ​​होते.

5G प्लॅनमुळे किमती वाढतील?

एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोघांनीही स्पष्ट केले आहे की प्रीमियम सेवा म्हणून 5G ऑफर करण्याची त्यांची कोणतीही योजना नाहीये. याचा अर्थ वापरकर्ते त्यांच्या सध्याच्या मोबाइल प्लॅनवर 5G सेवांचा आनंद घेऊ शकतील.

तुमच्या मोबाईलचे बिल का वाढू शकते?

देशातील सर्व दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या 5G नेटवर्क रोलआउटमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की या सर्वांसाठी त्यांना प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) या मध्ये वाढ सुनिश्चित करावी लागेल. 5G च्या वाढीमुळे ARPU मध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, तथापि, यास काही तिमाहींचा कालावधी लागू शकतो आणि त्यादरम्यान दरवाढ हा योग्य पर्याय असू शकतो.

दरवाढ महत्त्वाची का असू शकते?

तिन्ही कंपन्यांनी किमती वाढवण्याची गरज आहे. आगामी कर्जाची परतफेड करण्यासाठी Vodafone Idea ला नजीकच्या काळात 25% पेक्षा जास्त दरवाढीची गरज आहे. रिलायन्स जिओची मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ने संकेत दिले आहेत की कंपनी पुढील 18-24 महिन्यांत IPO साठी प्रयत्न करु शकते. तसेच एअरटेल बद्दल बोलायचे झाले तर 5G पायाभूत सुविधांवर खर्च केल्यामुळे कंपनीच्या कॅपेक्समध्ये (भांडवली खर्च) वाढ झाली आहे, ज्यामुळे दीर्घकालीन आर्थिक व्यवहार्यतेसाठी दर वाढवणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Brijbhushan Singh : ...तर ब्रिजभूषण सिंह काँग्रेसमध्ये दिसले असते, सोनिया गांधींची होती संमती; स्वतःच सांगितला किस्सा

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT